PM Narendra Modi : आपल्या इतिहासात 22 जुलै या दिवसाला विशेष महत्व आहे. कारण 22 जुलै 1947 रोजी याच दिवशी आपला राष्ट्रीय ध्वज स्विकारण्यात आला. स्वतंत्र भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहिलेल्या आणि त्यासाठी अतुलनीय साहस दाखवून प्रयत्नांची पराकाष्ठा करणाऱ्यांचेही स्मरण करण्याचा  आजचा दिवस असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी व्यक्त केले. तसेच पंतप्रधान मोदींनी नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेला बळ देण्याचं आवाहन देखील यावेली केलं. याशिवाय त्यांनी आपल्या इतिहासातील काही  संस्मरणीय गोष्टींचाही उल्लेख केला.


 22 जुलै 1947 रोजी याच दिवशी आपला राष्ट्रीय ध्वज स्विकारण्यात आला. त्यामुळं इतिहासात आजच्या दिवसाला विशेष महत्व आहे. पंतप्रधानांनी आज इतिहासातील काही गोष्टींचा उल्लेख केला. ज्यामध्ये आपल्या तिरंग्याशी संबंधित समितीच्या तपशीलांची माहिती आहे. तसेच पंडित नेहरुंनी सर्वप्रथम तिरंगा फडकवल्याच्या घटनेचाही उल्लेख पंतप्रधानांनी केला आहे. 


13  ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवा 


यावर्षी आपण सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. 'हर घर तिरंगा' मोहिमेला पाठबळ देऊया असेही मोदी म्हणाले. 13  ते 15 ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर तिरंगा फडकवा किंवा तुमच्या घरांमध्ये तिरंगा लावा. या मोहिमेमुळे आपले राष्ट्रीय ध्वजाशी असलेले ऋणानुबंध अधिक दृढ होतील असेही मोदी म्हणाले. आपल्या इतिहासात आजच्या 22 जुलै या दिवसाला विशेष महत्व आहे. कारण 1947 रोजी याच दिवशी आपला राष्ट्रीय ध्वज स्वीकारण्यात आला. वसाहतवादी राजवटीशी लढत असताना ज्यांनी स्वतंत्र भारताच्या ध्वजाचे स्वप्न पाहिले आणि त्यासाठी अतुलनीय साहस दाखवून प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्यांचे आज आपण  स्मरण करुया असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता  करण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नातला भारत घडवण्यासाठी आम्ही आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो असेही मोदी म्हणाले. 


महत्त्वाच्या बातम्या: