एक्स्प्लोर

आम्ही चार वर्षात जे केलं, त्यासाठी शंभर वर्ष कमी पडली असती- मोदी

स्वातंत्र्य दिनाच्या 72व्या वर्षाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप सरकारच्या कामाजा लेखाजोखा दिला.

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या 72व्या वर्षाच्या निमित्ताने केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप सरकारच्या कामाजा लेखाजोखा दिला. यावेळी आपण केलेल्या कामांची माहिती देताना मोदींनी यूपीए-2चं शेवटचं वर्ष- 2013शी तुलना केली.

"2013च्या गतीने आम्ही काम केलं असतं तर जी कामं आम्ही चार वर्षात केली ती कामं करायला शंभर वर्ष लागली असती", असं मोदींनी सांगितलं. शौचालय, वीज आणि गॅस कनेक्शन सारख्या मुलभूत सुविधांचा उल्लेख मोदींनी आपल्या भाषणात केला.

2013 विरुद्ध 2018 आपल्या साडेचार वर्षाच्या कामगिरीची माहिती देताना मोदी म्हणाले की, "आपण पुढे जात आहोत हे तोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत आपण कुठून सुरूवात केली यावर नजर टाकत नाही. आपण कुठून सुरूवात केली यावर नजर टाकली नाही तर आपण कुठपर्यंत पोहोचलो याचा अंदाज येत नाही."

2013च्या यूपीए-2 सरकारच्या कामाच्या वेगावर नजर टाकली आणि आज सरकारच्या कामाच्या वेगावर नजर टाकली, तर देश किती झपाट्यानं प्रगती करत आहे हे समजेल. 2013च्या गतीने देशात शौचालय बांधण्याचं काम झालं असतं तर, हे काम पूर्ण होण्यासाठी अनेक दशकं लागली असती.

गावात वीज पोहोचण्याच्या कामांचा 2013च्या गतीचा विचार केला, तर देशातील गावांमध्ये वीज पोहोचण्यासाठी आणखी काही वर्ष वाट पाहावी लागली असती, असं मोदी म्हणाले.

एलपीजी गॅस कनेक्शनबाबत बोलायचं तर 2013च्या गतीनं हे काम झालं असतं तर, हे काम पूर्ण होण्यासाठी 100 वर्ष लागली असती. तसेच 2013च्या गतीने देशातील ऑप्टिकल फायबरचं जाळं पसरवण्याचं काम झालं असतं तर, यासाठी अनेक पिढ्यांना वाट पाहावी लागली असती, असा टोला मोदींनी लगावला.

देशातील जनतेच्या आशा, अपेक्षा जास्त आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार यांना एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. आज आम्ही केंद्र आणि राज्य सरकार मिळून काम करत आहोत, हेच कारण आहे की देशाचा विकास झपाट्यानं होत आहे.

सरकारी कार्यालयं तीच आहेत, फाईल त्याच आहेत, निर्णय प्रक्रिया करणारे लोक तेच आहेत. मात्र चार वर्षात देशात बदल दिसून येत आहे, असं मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

संबंधित बातम्या

गरीब कुटुंबासाठी 'प्रधानमंत्री जनआरोग्य योजने'ची घोषणा

स्वातंत्र्य दिन : पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 15 महत्त्वाचे मुद्दे

नेहरु, मनमोहन, वाजपेयी ते मोदी, लाल किल्ल्यावर कुणाचं किती मिनिटे भाषण?

2022पर्यंत अंतराळात तिरंगा फडकणार- मोदी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
अमेरिकेची रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची परवानगी; राहुल गांधींचा ससंदेतील शब्द खरा ठरल्याची चर्चा; म्हणाले, 'हे देशाचं 'धोरण' नाही, ते तडजोड करणाऱ्या व्यक्तीच्या शोषणाचा परिणाम'
Karnataka Social Media Ban : 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदीचा प्रस्ताव, कर्नाटकचं मोठं पाऊल
Commercial CNG Gas Nagpur: अमेरिका-इराण युद्धामुळे भारताला झळ, नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात 20 रुपयांची वाढ
अमेरिका-इराण युद्धामुळे भारताला झळ, नागपूरमध्ये सीएनजीच्या दरात 20 रुपयांची वाढ
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'

व्हिडीओ

Uddhav Thackeray Eknath Shinde Vidhabhavan :उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे आमनेसामने;विधानभवनात काय घडलं?
Devendra Fadnavis Budget 2026 : 2 लाखांपर्यंत कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोठी घोषणा
Sanjay Raut PC : मोदींनी इस्रायल-इराणचं युद्ध थांबवावं, युद्धाचे परिणाम भारताला भोगावे लागणार - राऊत
Gold Silver Rate Update : अमेरिका इजरायल आणि इराणमधील युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण
Amol Mitkari On Ajit Pawar : अजितदादांशिवाय अर्थसंकल्प ही कल्पनाच असह्य, मिटकरींच्या डोळ्यात अश्रू

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
'सात बारा कोरा, कोरा ,कोरा म्हणत टाहो फोडून मते घेतली, मात्र दोन लाखांपर्यंतची तकलादू कर्जमाफी देत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला, अटी आणि शर्तींमुळे..' ; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर हल्लाबोल
IND vs NZ : टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलसाठी भारतीय संघात बदल? वरुण चक्रवर्तीला बाहेरचा रस्ता? कोणाला संधी मिळणार? 
Eknath Shinde : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार? देवेंद्र फडणवीसांसमोरचं एकनाथ शिंदे म्हणाले...
Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
BMC : मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
मनसेच्या यशवंत किल्लेदारांसाठी ठाकरेंच्या उमेदवाराची माघार, सहा प्रभाग समित्यांच्या निवडणुका बिनविरोध 
Maharashtra Budget 2026: लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
लाडकी बहीण योजनेबाबत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा, 2100 रुपयांबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
शेतकऱ्यांसाठी दोन लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर; कोणते शेतकरी पात्र? 
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
मोठी बातमी: जेसीबीच्या बाजूला जेवायला बसले, कामगारांना ट्रकने उडवलं, छत्रपती संभाजीनगर समृद्धी महामार्गावर दोघांचा जागीच मृत्यू, 3 जखमी
Embed widget