Pahalgam Terror Attack : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर काल हल्ला (Pahalgam Terror Attack) केल्याची घटना घडली आहे. यामध्ये 28 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ए महाराष्ट्रातील 6 जणांचा समावेश आहे. तर अनेकजण जखमी देखील झाले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील पनवेल येथील सुबोध पाटील आणि सौ माणिक पाटील हे काल 40 जणांच्या ग्रुप सहित या हल्ल्यात सापडले होते. त्यातील एका पर्यटकाला उर्दू भाषेतील पुस्तक वाचायला न आल्याने दहशतवाद्यानी ठार मारले होते. तर एका चहा टपरीत लपलेले असताना सुबोध पाटील यांच्या मानेला गोळी चाटून गेली होती. आज धनंजय जाधव व पुजा मोरे जाधव या दोघांनी पाटील यांची रुग्णालयात भेट घेऊन चौकशी केली. त्यांचा परिवार आज काश्मीरमध्ये पोहोचत आहे. या पर्यटकांच्या नातेवाईकांसोबत आम्ही संपर्कात असल्याचे धनंजय जाधव म्हणाले.
दरम्यान, या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या पर्यटकांना इंडियन आर्मी 92 बेस हॉस्पिटल पेहलगाम इथं भरती करण्यात आलं आहे. या जखमी पर्यटकांची ICU मध्ये जाऊन धनंजय जाधव व पुजा मोरे जाधव यांनी भेट घेतली. यावेळी पनवेलच्या सुबोध पाटील यांनी घडलेला सगळा थरात सांगितला. एका चहाच्या टपरीत लपलो असताना माझ्या मानेला गोळी चाटून गेल्याची माहिती सुबोध पाटील यांनी दिली आहे. अंगावर काटा आणणारा त्यांचा हा अनुभव होता.
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान
दरम्यान, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ काश्मीरमधील नागरिक व पुणे येथील पर्यटक धनंजय जाधव आणि पुजा धनंजय जाधव यांनी दहशतवाद्यांच्या विराधात मोर्चा काढत निषेध व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. दरम्यान, पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असून जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्याचा तपासा आता NIA कडून केला जात आहे. पर्टकांसाठी हा परिसर बंद करण्यात आला असून तपास यंत्रणेला अडचण होऊ नये या अनुशंगाने पेहलगामपूर्वीच जम्मू काश्मिरचे पोलिस वाहने अडवत असून पुढे गाड्या पाठवत नसून या गाड्या पून्हा श्रीनगरच्या दिशेने पाठवत आहेत.
महत्वाच्या बातम्या: