Amit Shah Speech :  मणिपूरच्या मुद्द्यावरुन इंडिया आघाडी सरकारकडून अविश्वासाच्या प्रस्तावाला चोख उत्तर देण्यात आलं आहे. यावेळी बोलतांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील टीकास्त्र डागलं. अमित शाह यांच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे सविस्तर जाणून घेऊया. 




  • मणिपूरच्या मुद्द्यावर सरकार चर्चा करण्यास तयार 




मणिपूरच्या मुद्द्यावर सरकार चर्चा तयार आहे पण विरोधक या मुद्द्यावर चर्चा होऊ देत नसल्याचं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. तसेच मणिपूरची घटना ही लज्जास्पद आहेच पण त्यावर राजकारण करणं हे त्याहून लज्जास्पद असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे. 




  • अविश्वास प्रस्ताव आणि राजकारण




हा अविश्वासाचा प्रस्ताव केवळ जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी आणला असल्याचं म्हणत अमित शाह यांनी अविश्वासाच्या ठरावावर भाष्य केलं आहे. तसेच विरोधकांचे हे फक्त राजकारण असून यामधून काहीही होणार नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे. 




  • पंतप्रधान मोदींचे कौतुक




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाचं कौतुक हे संपूर्ण जगांनं केलं आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय पंतप्रधान असल्याचं म्हणत अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. 




  • शेतकऱ्यांना मदतीचा हात




मोदी सरकारने शेतकऱ्यांना कायम मदतीचा हात दिला आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठिशी हे सरकार उभं असल्याचं अमित शाह यांनी म्हटलं आहे. 




  • मोदी सरकारच्या काळात काश्मीरचा विकास




मोदी सरकारच्या काळात काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात आणला आहे. तसेच काश्मीरमधील पर्यटनला चालना दिल्याचं देखील माहिती देखील अमित शाह यांनी दिली आहे. 2014 पर्यंत काश्मीरमध्ये फक्त राजकारण सुरु होतं असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 




  • देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती 




पुढील काही काळात देशाची अर्थव्यवस्था ही महत्त्वाच्या टप्प्यावर असणार असल्याचा विश्वास देखील अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. 




  • अमित शाह यांच विरोधकांवर टीकास्त्र 




फक्त तुम्हालाच सरकारवर अविश्वास आहे, देशाच्या जनेताला सरकावर अविश्वास नाही असं म्हणत अमित शाह यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे. 




  • पीएफआयवर बंदी घातली 




पीएफआयवर आम्ही बंदी घातली. काश्मीरमधील दलित आदिवासींना आम्ही आरक्षण दिलं. तर देशाविरोधात कारवाई करणाऱ्यावर आम्ही कारवाई केली असं अमित शाह यांनी संसदेत म्हटलं आहे. 




  • कोरोना काळातील सरकारचं काम 




कोरोना काळात सरकारने मोफत लस दिल्याचं देखील अमित शाह यांनी म्हटलं आहे. तसेच गरिबांना मोफत रेशन देखील आम्ही त्या काळात वाटलं अशी माहिती देखील त्यांनी सभागृहात दिली आहे. 




  • अमित शाहांचा राहुल गांधींवर निशाणा 




अमित शाह यांनी त्यांच्या भाषणादरम्यान काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. यावेळी बोलतांना त्यांनी म्हटलं की, 'एकचा नेत्याला एका पक्षाने 13 वेळा लाँच केले आहे.' 


हेही वाचा :


Amit Shah : 'हा अविश्वास प्रस्ताव केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न', केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची लोकसभेत फटकेबाजी