NO Conclusive Proof of Ram Setu Govt Says in Parliament: भारत (India News) आणि श्रीलंकादरम्यान (Shri Lanka News) समुद्रात बांधण्यात आलेल्या कथित रामसेतूच्या (Raam Setu) मुद्द्यावर गुरुवारी राज्यसभेत (Rajya Sabha) चर्चा झाली. याबाबत केंद्र सरकारनंही (Central Government) संसदेत उत्तर दिलं. रामसेतूच्या अस्तित्वाचे स्पष्ट पुरावे अद्याप मिळालेले नाहीत, असं केंद्र सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. प्राचीन द्वारका आणि अशा प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत असल्याचं केंद्राच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.


हरियाणाचे (Haryana) अपक्ष खासदार कार्तिकेय शर्मा (MP Kartikeya Sharma) यांनी राज्यसभेत विचारलं होतं की, आमच्या गौरवशाली इतिहासावर सरकार काही वैज्ञानिक संशोधन करतंय का? कारण आधीच्या सरकारनं या विषयाला महत्त्व दिलं नाही. कार्तिकेय शर्मा यांच्या या प्रश्नाला केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Union Minister Jitendra Singh) यांनी उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी रामसेतूच्या अस्तित्वासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली. 


हा इतिहास 18 हजार वर्षांचा : जितेंद्र सिंह


जितेंद्र सिंह म्हणाले की, "आमच्या खासदारानं रामसेतूच्या मुद्द्यावर प्रश्न केला याचा मला आनंद आहे. पण हा 18000 वर्षांचा इतिहास आहे. अशा परिस्थितीत आपल्या काही मर्यादा आहेत. ते म्हणाले की, आपण ज्या पुलाबद्दल बोलतोय, तो 56 किलोमीटर लांब होता. स्पेस टेक्नोलॉजीमार्फत शोध घेतला त्यावेळी समुद्रात काही दगड दिसून आले. त्या दगडांची एक अशी आकृती आहे, जी त्यामध्ये सातत्य दाखवते. तसेच, समुद्रात काही बेटे आणि चुनखडीसारख्या गोष्टीही सापडल्या आहेत. स्पष्ट शब्दात सांगायचं तर रामसेतूचं खरं रूप तिथे आहे की नाही, हे सांगणं कठीण आहे. दरम्यान, अशी काही चिन्हं आहेत जी सूचित करतात की, तिथे एक रचना अस्तित्वात असू शकते.


रामसेतूच्या मुद्द्यावर काँग्रेसवर आरोप-प्रत्यारोप 


रामसेतूचे अस्तित्व मान्य नसल्याचा आरोप करत भाजप आतापर्यंत काँग्रेसवर सातत्यानं निशाणा साधत होती. मात्र आता केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी संसदेत दिलेल्या उत्तरामुळे काँग्रेसला प्रत्युत्तराची संधी मिळाली आहे. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी ट्विटरवर सरकारचे उत्तर शेअर केलं आणि लिहिलंय की, "सर्व भक्तांनो, उघड्या कानांनी ऐका आणि उघड्या डोळ्यांनी पाहा. मोदी सरकार संसदेत म्हणतंय की, राम सेतूच्या अस्तित्वाचा कोणताही पुरावा नाही."


रामसेतू नेमका आहे कुठे?


भारतातील रामेश्वरम आणि मन्नार बेट यांच्यामध्ये चुनखडीच्या खडकांची साखळी आहे. भारतात ही साखळी रामसेतू म्हणून ओळखली जाते. या पुलाची लांबी सुमारे 30 मैल (48 किमी) इतकी आहे. या भागांत समुद्र खूप उथळ आहे. त्यामुळे याठिकाणी मोठ्या बोटी आणि जहाजं चालविण्यात अडचणी येतात. सीतेला रावणाच्या कैदेतून मुक्त करण्यासाठी श्रीरामानं हा सेतू बांधला, असा दावा अनेक पौराणिक कथांमध्ये करण्यात आला आहे. त्यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या वानरांच्या फौजेनं रावणाच्या लंकेत पोहोचण्यासाठी दगडांवर 'श्रीराम' नाव लिहून ते पाण्यात टाकले आणि ते दगड पाण्यावर तरंगले. मग वानरांनी सगळ्या दगडांवर श्रीराम लिहिलं, ते पाण्यात टाकले आणि लंकेपर्यंत जाण्यासाठी पूल बांधला, असा पौराणिक कथांमध्ये उल्लेख आहे. 1993 मध्ये, नासानं या रामसेतूची उपग्रह छायाचित्रं प्रसिद्ध केली होती, ज्यात त्याचं वर्णन मानवनिर्मित पूल म्हणून केलेलं होतं. दरम्यान, रामसेतूच्या मुद्द्यावरुन भारतात अनेकदा आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं पाहायला मिळालं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


मुख्यमंत्र्यांच्या नातवाला पंतप्रधानांची टाळी! चिमुरड्या रुद्रांश शिंदेला मोदींनी खाऊही दिला अन्...