एक्स्प्लोर

गुजरातमधून उत्तर भारतीयांचं हजारोंच्या संख्येने पलायन सुरुच, राजकारणही तापलं

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशी बातचीत केली आहे. राहुल गांधी यांनी या हिंसाचाराला सरकारची चुकीची धोरणं जबाबदार असल्याचं म्हटलं आहे.

अहमदाबाद : हिंसाचाराच्या भीतीने उत्तर भारतीयांचं गुजरातमधून पलायन सुरुच आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी या प्रकरणी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याशी बातचीत केली आहे. पोलिसांकडूनही हल्लेखोरांची धरपकड सुरु असून आतापर्यंत शेकडो जणांना अटक करण्यात आली आहे. गुजरातच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम उत्तर भारतीयांवर होत असलेल्या हिंसाचाराचा परिणाम गुजरातच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. गुजरात चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने याबाबत मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना पत्र लिहिलं आहे. परप्रांतियांवरील हल्ल्यांमुळे उत्पादन आणि व्यापारावर परिणाम झाला असल्याचं चेंबर ऑफ कॉमर्सने म्हटलं आहे. हिंसाचारामुळे गांधीनगर, मेहसाणा, साबरकांठा, पाटण आणि अहमदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीयांवर हल्ले करण्यात आले. त्यानंतर उत्तर भारतीयांनी घरचा रस्ता धरला आहे. राहुल गांधींची सरकारवर टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमधील हिंदी भाषिकांवरील हल्ल्यांना सरकारची चुकीची धोरणं जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. ''गरीबीपेक्षा मोठी दहशत नाही. गुजरातमधील हिंसाचाराचं मूळ तेथील बंद पडलेले कारखाने आणि बेरोजगारी आहे. व्यवस्था आणि अर्थव्यवस्था दोन्ही कोलमडली आहे. कामगारांना निशाणा करणं पूर्णपणे चुकीचं आहे. मी पूर्णपणे याच्या विरोधात आहे,'' असं ट्वीट त्यांनी केलं आहे. हजारोंच्या संख्येने पलायन मध्य प्रदेशातील भिंड या आपल्या गावी परतण्यासाठी बसची वाट पाहत बसलेल्या राजकुमारी जाटवने 'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सांगितलं, की ''माझा मुलगा घराबाहेर खेळत होता. अचानक त्याच्यावर कुणीतरी हल्ला केला. पती रंगाचं काम करुन घर चालवतात.'' तर भिंडच्या धर्मेंद्र कुशवाह यांच्या मते, यूपी, बिहार आणि मध्य प्रदेशच्या कमीत कमी 1500 लोकांनी आतापर्यंत गुजरात सोडलं आहे. सत्यम ट्रॅव्हलसचे पिंटो सिंह यांच्या माहितीनुसार, ''मध्य प्रदेश, बिहार आणि उत्तर प्रदेशात जाण्यासाठी गुजरातमधून दोन दिवसांनी एक बस जाते, ज्यात 25 प्रवासी असतात. पण आता एका बसमध्ये 80 ते 90 जण जात आहेत. शिवाय एका दिवसाला 20 बस भरुन जात आहेत.'' काय आहे गुजरातमधील प्रकरण? गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यात गेल्या आठवड्यात 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका बिहारच्या व्यक्तीला अटक केली आहे. घटनेनंतर गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या लोकांना लक्ष्य केलं जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, साबरकांठा जिल्ह्यातील एका गावात 14 महिन्यांच्या मुलीवर बलात्कार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बिहारच्या रवींद्र साहू नावाच्या एका व्यक्तीला घटनेच्या दिवशीच अटक करण्यात आली. गुजरातमध्ये यूपी, बिहारींवर हल्ले, अल्पेश ठाकोर समर्थित हल्ले असल्याचा आरोप
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut On Tisari Aghadi : विरोधकांची मत कमी करण्यासाठी तिसरी आघाडीShivaji Kardile Rahuri Vidhan Sabha : राहुरी मतदारसंघातूनच विधानसभा लढवणार : शिवाजी कर्डीलेRatnagiri Khed Crime News : रहस्यमय गुन्ह्यात सिंधुदुर्गमधून दोन तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यातTirupati Prasad Update : तिरुपतीच्या प्रसादात चरबीचे अंश आढळले, चंद्राबाबुंचा दावा खरा ठरला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule Crime: गिरासे कुटुंबीयांचा गूढ मृत्यू, एकाच घरात चार मृतदेह, पोलिसांना सापडला महत्त्वाचा क्लू
धुळ्यात चौकोनी कुटुंबाची आत्महत्या, पोलिसांना सुसाईड नोट सापडली, नातेवाईक म्हणतात घातपात झालाय
Laxman Hake : मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
मराठा तेवढाच मेळवावा आणि ओबीसी संपवावा, हे एकनाथ शिंदेंचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
तिरुपती प्रसादाच्या लाडूत प्राण्यांची चरबी आढळली; देवस्थान समितीचे सदस्य मिलिंद नार्वेकरांची एका वाक्यात प्रतिक्रिया
Army Officer Beaten Odisha : पोलीस ठाण्यात आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
आर्मी ऑफिसरच्या होणाऱ्या पत्नीची मध्यरात्री अधिकाऱ्याने अंतर्वस्त्रे काढली, पहाटे आलेल्या पीआयने पॅन्ट खेचत प्रायव्हेट पार्ट दाखवला
Share Market Record : मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
मोठी बातमी! शेअर बाजारात नवा विक्रम, इतिहासात प्रथमच सेन्सेक्सनं गाठला 84 हजारांचा टप्पा
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
भंडाऱ्यात धक्कादायक घटना, चिमुकलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न; पीडित कुटुंबाने मोर्चा काढल्यावर नराधमांचा प्राणघातक हल्ला
Tirupati Laddu Controversy : तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
तिरुपती प्रसादाच्या लाडूत काय काय घातलं जातंय? प्राण्यांच्या चरबीनंतर आता आणखी एक तेल मिसळत असल्याचे समोर!
Pune News: पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत चोरटे मालामाल, तब्बल 300 मोबाईल लंपास
Embed widget