रांची : वेगवेगळ्या आजारांमुळे गरिबांना खूप जास्त जास्त तर होतो. त्यामुळे देशामध्ये एकीकडे गरिबी कमी होत असताना त्यांच्यासाठी योगाचे माध्यम पोहोचायला पाहिजे.


गरिबांपर्यंत योगा पोहोचल्याने ते आजारांपासून वाचू शकतील. यामुळे गरिबी दूर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पाचव्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या निमित्ताने झारखंडच्या रांचीमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मोदींनी ४० हजार लोकांसोबत योग करत योग दिवस साजरा केला.

यावेळी ते म्हणाले की, कोणत्याही व्यक्तीला निरोगी बनविण्यासाठी योग्य फार महत्वाचा आहे. आपल्याला योगाच्या अभियानाला वेगळ्या स्तरावर घेऊन जायचे आहे. योग्य आपल्या देशात पहिल्यापासून आहे. आपल्या संस्कृतीचा अभिन्न हिस्सा आहे, असे ते म्हणाले. यामध्ये आसन आणि मुद्रांना व्यक्त केले जाते.



ही आधुनिक योगाची यात्रा ग्रामीण आणि आदिवासी भागात पोहोचलेली नाही. ही आधुनिक योगाची यात्रा शहरांपासून गावांमध्ये शेवटच्या घटकांपर्यंत न्यायची आहे. गरीब आणि आदिवासींपर्यंत योग पोहोचवायचे आहे, असे मोदी म्हणाले.

योगामध्ये आजारांचा सामना करण्यासोबत पुरातन भारतीय संस्कृतीची झलक आहे. योगामध्ये शिस्त आणि स्वयंपूर्णता आहे. याचे पालन आयुष्यभर करायचे आहे. योगा धर्म, जात, पंथाच्यावर आहे. योग सर्वांचा आहे आणि सर्व लोक योगाचे आहेत, असे ते म्हणाले.

या सरकारने योगाला गेल्या पाच वर्षात आरोग्याच्या व्यवस्थेशी जोडले आहे. योगा प्रति जागरूकता प्रत्येक वर्गात पोहोचली आहे, असेही मोदी यांनी सांगितले. आज  युवापिढी योगा करताना मला आनंद होतो, असेही ते म्हणाले.