एक्स्प्लोर
भारताकडून पाकला सडेतोड उत्तर, चार पाकिस्तानी चौक्या उडवल्या!

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) : भारतीय सैन्याने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिलं आहे. भारतीय सैन्याने प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या चार चौक्या उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या या कुरापतींना अशाच प्रकारे सडेतोड उत्तर दिलं जाणार आहे. कुपवाडाच्या केरन सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने कारवाई केली. भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरानंतरही पाकिस्तानने गोळीबार सुरुच ठेवला. भारत सरकारकडून सांगण्यात आलंय की, पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल. दरम्यान, काल रात्रीपासून पुन्हा पाकिस्तानने कुरापती सुरु केल्या आहेत. जांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. त्यानंतर या गोळीबाराच्या प्रत्युत्तरासाठी भारताकडून बीएसएफनेही गोळीबार सुरु केला.
Before You Go
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story






















