नवी दिल्ली: भारत आणि चीन यांच्यात सुरु असलेल्या डोकलाम वादावरुन, भारताचा मोठा विजय झाला आहे. दोन्ही देशांनी आपलं सैन्य हटवण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे भारताच्या व्यूहरचनेचा विजय असल्याचं बोललं जात आहे.


डोकलाम वादाप्रकरणी भारत आणि चीन यांच्यात राजनैतिक स्तरावर सातत्याने चर्चा सुरु आहे. या चर्चेतून दोन्ही देशांनी सैन्य मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’

गेल्या दोन महिन्यांपासून डोकलाम वादावरुन भारत आणि चीन यांच्यात तणाव होता. दोन्ही देशांनी आपआपल्या सैन्यांना या भागात पाचारण केलं होतं. दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये मारहाणीच्याही घटना घडल्या होत्या.



‘डोकलाम’ भारत-चीन-भूतानचं ट्रायजंक्शन

सध्या सिक्किममध्ये भारत-चीनदरम्यान 220 किमीची सीमा आहे. यातील सर्व भागात शांततेचं वातावरण आहे. पण ज्या भागात चीन आणि भारताची सीमा भूतानला जोडली आहे, त्या भागावरुन उभय देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. भारत-भूतान दरम्यान सिक्किममध्ये 32 किमीची सीमा रेषा आहे. जवळपास 50 वर्षांपूर्वी म्हणजे 1967 मध्ये भारतीय लष्कराने सिक्किममध्ये चीनी सैन्याला धुळ चारली होती. त्यानंतर चीनकडून सिक्किमच्या भागात कधीही घुसखोरी झाली नाही. पण सध्या या तिन्ही देशांचं ट्रायजंक्शन असलेल्या डोकलाममध्ये तणावाची परिस्थिती आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

चीनने जेव्हा चुंबी खोऱ्यात याटुंगमध्ये डोकलाम परिसरात रस्ते बांधणीचं काम हाती घेतलं, त्यावेळी भारतानं त्याचा कडाडून विरोध केला. पण चीननं या विरोधाला वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या. म्हणून या भागावर लक्ष ठेवण्यासाठी भारतानं दोन बंकर उभारले. पण चिनी सैन्यानं भारताचे हे दोन्ही बंकर उद्ध्वस्त केली. त्यानंतर भारतीय लष्कराने आपली ‘रिइनफोर्समेंट’ म्हणजे लष्कराची एक मोठी तुकडी या भागात तैनात केली, त्यानंतर दोन्ही देशातील सैन्यात तणाव वाढला.

संबंधित बातम्या :

डोकलाम वाद : सिक्कीम, अरुणाचल सीमेवर भारतानं सैन्य वाढवलं!

डोकलाम आमचाच, भूतानने चीनला तोंडावर आपटलं!

भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’

युद्धासाठी तयार राहाचीनच्या राष्ट्रपतींचे लष्कराला आदेश

आमच्या लष्कराला हरवणं अशक्यचिनी लष्कराच्या प्रवक्त्याची दर्पोक्ती

भारत-चीन वादाचं नेमकं कारण असलेलं डोकलामचं ‘ए’ टू ‘झेड’

बिजिंगमधील राजदुतांच्या परिषदेत चीनची भारताला धमकी

…तर पाकिस्तानच्या विनंतीवर काश्मीरमध्ये सैन्य घुसवू : चीनी मीडिया

चिनी दूतावासाकडून भारतात येणाऱ्या नागरिकांसाठी ‘ट्रॅव्हल अलर्ट’ जारी

G-20 : मोदी आणि शी जिनपिंग यांची भेट, डोकलाम प्रश्नावरही चर्चा : सूत्र

चीनच्या ‘ड्रॅगन’वर भारताच्या ‘रुक्मिणी’ची नजर

सिक्कीममधून भारताने सैन्य हटवावं, चीनच्या उलट्या बोंबा

…अन्यथा 1962 पेक्षा गंभीर परिणाम भोगावे लागतील, चिनी मीडियाची पुन्हा धमकी

हिंदी महासागरात चीनच्या कुरापती, युद्धनौका तैनात