एक्स्प्लोर

Weather Updates: कुठे उष्णतेची लाट, तर कुठे पावसाची शक्यता, महाराष्ट्रातही पारा वाढला; जाणून घ्या देशातील परिस्थिती

Weather Today Updates: देशात अनेक ठिकाणी तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. तसेच, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी अनेक राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Weather Today Updates: गेल्या काही आठवड्यांपासून देशभरात सतत कडक ऊन पडतंय. राष्ट्रीय राजधानीसह देशातील अनेक राज्यांमध्ये सकाळपासून रात्री उष्ण वाऱ्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे लोकांच्या अडचणीही वाढत आहेत. हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशातील अनेक भागांत तापमान 45 अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. तसेच, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशातील बहुतांश भागात पावसाची शक्यता आहे.

'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मंगळवारी (16 मे) दिल्ली आणि आसपासच्या भागांत 40-50 किमी/तास वेगानं जोरदार वारे वाहतील. तसेच यानंतर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

याशिवाय, मंगळवार, 16 मे रोजी दिल्लीत कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमध्ये कमाल तापमान 46 अंशांच्या आसपास पोहोचलं आहे. तसेच, 16 मे रोजी राज्यातील भरतपूर, बिकानेर दौसा जैसलमेर, नागौर, चुरू, सीकर, श्रीगंगानगर, हनुमानगढ जिल्हे आणि आसपासच्या भागांत वादळ आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

महाराष्ट्रात उष्णतेची लाट 

महाराष्ट्रातही वाढत्या उष्णतेमुळं नागरिक बेजार झाले आहेत. रखरखत्या उन्हामुळे नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. राज्यात कमाल तापमान 44 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं आहे. हवामान खात्यानं देशातील बहुतांश शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. याशिवाय राज्यातील अनेक भागांत पारा 45च्या पुढे जाऊ शकतो, असा इशाराही हवामान विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे. 

महाराष्ट्रात वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागा होरपळल्या

वाढत्या उष्णतेचा परिणाम शेतपिकांवरही होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आधी अवकाळी आणि गारपीट अन् आता वाढलेली उष्णता यांमुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हिंगोलीत तर वाढत्या तापमानामुळे केळीच्या बागा होरपळल्या आहेत. 

हिंगोली जिल्ह्यातील वसमत आणि कळमनुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात केळीच्या बागांची लागवड केली जाते. यावर्षी 1600 हेक्टरवर केळीच्या बागांची लागवड केली आहे. परंतु मागील चार ते पाच दिवसांपासून अचानक तापमानात वाढ झाल्यानं याचा फटका केळीच्या भागांना बसतोय. हिंगोली जिल्ह्याचं तापमान 42 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचल्यामुळे या केळीच्या बागा होरपळून निघत आहेत. केळीची पानं या तापमानामुळे पिवळी पडत आहेत, तर काही पानं वाळली आहेत. केळीच्या झाडांमधील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यानं अनेक केळीची झाडं उन्मळून  पडली आहेत, तर तापमान वाढल्यानं केळीच्या फळांवर काळे डाग पडत आहेत. हे केळीचं पिक काहीच दिवसांमध्ये तोडणी करून विक्री केली जाणार होती. परंतु तापमान वाढल्याचा फटका या केळीच्या बागांना बसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.  

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
Trinamool Congress: ममता बॅनर्जींना हादऱ्याची मालिका सुरूच, तब्बल 58 आमदार फुटल्यानंतर आता 21 खासदार सुद्धा भाजपच्या गळाला? गुप्त बैठकीचा फोटोही समोर
ममता बॅनर्जींना हादऱ्याची मालिका सुरूच, तब्बल 58 आमदार फुटल्यानंतर आता 21 खासदार सुद्धा भाजपच्या गळाला? गुप्त बैठकीचा फोटोही समोर
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
Ayodhya Ram Mandir: अयोध्या राम मंदिराच्या दानपेटीतून पैशांची चोरी! अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?
अयोध्या राम मंदिराच्या दानपेटीतून पैशांची चोरी! अखिलेश यादव यांचा गंभीर आरोप, पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतलं; नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी, वर्षा उसगावकरांना पराभवाचा धक्का
मेघराज राजे भोसलेंची अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर एकहाती सत्ता, समर्थ पॅनलचे सर्व उमेदवार विजयी, वर्षा उसगावकरांना पराभवाचा धक्का
Iran War Live Update: इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
इराण-इस्रायल युद्धाचा पुन्हा भडका, होर्मुझमध्ये जहाजावरील हल्ल्यात 24 भारतीय अडकले, व्हिडिओ शेअर करत नेव्हीकडे मागितली मदत
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
काय ही घाण, ह्यांची नावं लिहून घ्या; सुनेत्रा पवारांची सरकारी रुग्णालयात धाड, अजित दादास्टाईल डॉक्टरांना झापलं
India vs Afghanistan: टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
टीम इंडियाकडून अफगाणिस्तानची तिसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रातच शिकार; कसोटी क्रिकेटमधील भारताचा आजवरचा सर्वात मोठा विजय
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या बैठकीत 5 मुद्द्यांवर सहमती; ठाकरेंची ऑनलाईन उपस्थिती, ठरली पुढील रणनीती
Trinamool Congress: ममता बॅनर्जींना हादऱ्याची मालिका सुरूच, तब्बल 58 आमदार फुटल्यानंतर आता 21 खासदार सुद्धा भाजपच्या गळाला? गुप्त बैठकीचा फोटोही समोर
ममता बॅनर्जींना हादऱ्याची मालिका सुरूच, तब्बल 58 आमदार फुटल्यानंतर आता 21 खासदार सुद्धा भाजपच्या गळाला? गुप्त बैठकीचा फोटोही समोर
Pune Crime News: पुणे पोलीस कुणाच्या चावीवर चालतात? 156 पैकी 78 जणांना का सोडले? 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीवरून रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या, 'प्रांजल खेवलकर प्रकरणात...'
पुणे पोलीस कुणाच्या चावीवर चालतात? 156 पैकी 78 जणांना का सोडले? 'प्रोजेक्ट एक्स' पार्टीवरून रोहिणी खडसे संतापल्या; म्हणाल्या, 'प्रांजल खेवलकर प्रकरणात...'
Loan : पुढील वर्षापासून 62 टक्के लोकांना गृह कर्ज अन् वाहन कर्ज मिळणं अवघड होणार? आरबीआयकडून नियमांचा ड्राफ्ट जारी
एप्रिल 2027 पासून 62 टक्के लोकांना गृह आणि वाहन कर्ज मिळणं अवघड होणार, आरबीआयच्या नियमामुळं काय काय बदलणार?
Embed widget