ABP Network Ideas of India Summit 2023 : एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) आयडियाज ऑफ इंडिया (ABP Network Ideas of India Summit 2023) या परिसंवाद कार्यक्रमाला मुंबई येथे 25 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. या परिसंवादामध्ये देश आणि विदेशातील दिग्गज व्यक्तिमत्वांची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. विविध क्षेत्रांतील दिग्गज या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाहक डॉ. कृष्ण गोपाल (Dr. Krishna Gopal) यांनी शुक्रवारी हजेरी लावली. भारताचा शेजारी देश पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. असं असलं तरी सीमावर्ती भागातील पाकिस्तानच्या कुरापती काही कमी झालेल्या नाहीत, यावर डॉ. कृष्ण गोपाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


पाकिस्तान का सुधारत नाही?


कुरापती पाकिस्तान कधी सुधारणार असा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात उपस्थित होतो. यावर डॉ. कृष्ण गोपाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. डॉ. कृष्ण गोपाल यांनी म्हटलं आहे की, मूळात पाकिस्तानची निर्मितीच शत्रूत्वामुळे झाली आहे. पाकिस्तान कोणत्याही परिस्थिती शत्रूत्व सोडण्यास तयार नाही. पाकिस्तानची निर्मिती भारतासोबत शत्रूत्वाच्या भावनेतून झाली आहे. दरम्यान, पाकिस्तान का सुधारत नाही, यावर गोपाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


''पाकिस्तानने कुरुपती सोडून भारताकडे मदत मागावी''


कृष्ण गोपाल यांनी म्हटलं की, जर आर्थिक संकटात सापडलेल्या कुरापती पाकिस्तानने भारताविरोधी कारवाया सोडून गहू देण्यासाठी भारताकडे मदत मागितली तर भारत याचा उदारमताने विचार करेल आणि पाकिस्तानला मदत करेल. पाकिस्ताननं आपलं मन शांत ठेवावं आणि भारतासोबत शत्रुत्वाची भावना सोडावी. पण पाकिस्तानला शत्रूत्व सोडायचं नाहीय.


कंगाल पाकिस्तानला भारताची मदत का नको? 


डॉ. कृष्ण गोपाल यांनी सांगितलं आहे की, 'सर्वे भवन्तु सुखिनः' असे भारताचे विचार आहेत. जगात सर्व सुखी असावेत, कोणीही माणूस उपाशी राहू नये, असा याचा अर्थ आहे. आपल्या शेजारील देश पाकिस्तान सध्या आर्थिक संकटात आहे, पण तरीही सीमेवर पाकिस्तानकडून आपल्यावर वारंवार हल्ले सुरू आहेत. पाकिस्तानने भारताकडे उदार मनाने मदत मागितली तर भारत नक्कीच मदत करेल. ही भारताची परंपरा आहे. भारताने कोरोना काळात गरजू देशांना मदत केली. पण पाकिस्तान शत्रुत्व सोडण्यास तयार नाही, असं डॉ. कृष्ण गोपाल यांनी म्हटलं आहे.


पाकिस्तानकडून भारतावर चार वेळा आक्रमण


डॉ. कृष्ण गोपाल पुढे म्हणाले, ''पाकिस्तानने आपले चित्त शांत ठेवावे. स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने भारतावर चार वेळा आक्रमण केले आहे. पाकिस्तानने आपल्या स्वभावात सुधारणा करून शत्रुत्वाची भावना कायमची सोडली पाहिजे. पाकिस्तान भारतात दहशतवादी पाठवतो त्यामुळे पाकिस्तानसोबत संबंध सामान्य होणं कठीण आहे.'' 


एबीपी नेटवर्क 'आयडियाज ऑफ इंडिया'


एबीपी नेटवर्कच्या (ABP Network) 'आयडियाज ऑफ इंडिया' (ABP Ideas Of India) हा परिसंवाद 25 आणि 26 फेब्रुवारी रोजी मुंबईमध्ये (Mumbai) पार पडणार आहे. यंदा या कार्यक्रमाचं दुसरं वर्ष असून यंदाची थीम 'नया इंडिया' (Naya India) आहे. या परिसंवादामध्ये एकाच व्यासपीठावर देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांसोबत संवाद साधला जाणार आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Ideas of India Summit 2023 : कंगाल पाकिस्तानला भारताची मदत का नको? RSS चे कृष्ण गोपाल यांनी सांगितलं कारण