एक्स्प्लोर

सीमेपलीकडून होणारी दहशतवाद्यांची घुसखोरी कमी झाली, गृहमंत्रालयाचा दावा

दहशतवादाविरोधात सरकारने उचललेली कडक पावलं आणि झिरो टॉलरन्स धोरणामुळं दहशतवादी हल्ले आणि स्थानीय लोकांचं दहशतवादाकडं झुकण्याचं प्रमाण कमी झालं आहे. तसेच आतापर्यंत 22 टक्के जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे.

मुंबई : सीमेपलीकडून दहशतवाद्यांच्या घुसखोरीच्या प्रमाणात मोठ्या संख्येने घट झाली असल्याचा दावा गृहमंत्रालयाकडून करण्यात आला आहे. यावर्षी पहिल्या सहा महिन्यात तब्बल 43 टक्क्यांनी घुसखोरीच्या घटना कमी झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवादाविरोधात सरकारने उचललेली कडक पावलं आणि झिरो टॉलरन्स धोरणामुळं दहशतवादी हल्ले आणि स्थानीय लोकांचं दहशतवादाकडं झुकण्याचं प्रमाण कमी झालं आहे. तसेच आतापर्यंत 22 टक्के जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. भारताकडून पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद आणि घुसखोरीविरोधात कडक पावलं उचलल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी मुखिया आणि आयएसआयचे धाबे दणाणले आहेत. पाकिस्तानी दहशतवादी भारतात पकडला गेला किंवा मारला गेला तर आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी तर होते. सोबतच पाकला आर्थिक फटका देखील बसत आहे. तसेच घुसखोरी वाढल्यावर भारताकडून पुन्हा एकदा त्यांच्या भागात घुसून सर्जिकल अथवा एअर स्ट्राईक केला जाऊ शकतो, ही भीती देखील त्यांच्या मनात आहे. पाकिस्तानला स्पष्टपणे असा संदेश गेला आहे की, दहशतवादी घटना घडल्या तर भारत काहीही करू शकतो. दहशतवादी पकडले गेले किंवा मारले गेले तर त्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर होते, याचा फटका पाकिस्तानला बसतो. यामुळे सीमेपलीकडून होणारी घुसखोरी आणि दहशतवादी घटनांच्या संख्येत यावर्षी मोठी घट झाली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. पाकिस्तानातून येणाऱ्या एकाही दहशतवाद्याला सोडू नका. पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जावे. काश्मीरच्या मुद्दयावर भारत कुठल्याही परिस्थितीत मागे हटणार नाही, असे निर्देश गृहमंत्र्यांनी दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. अशी आहे आकडेवारी 2016 ते  2018 मध्ये  97 दहशतवादी पकडले तर या काळात या दहशतवाद्यांचे 29 तळ शोधून उध्वस्त केले. 2016 मध्ये 150, 2017 मध्ये  213, 2018 मध्ये 257 तर 2019 मध्ये जून महिन्यापर्यंत  113 दहशतवादी मारले गेले आहेत. दहशतवादी घटनांमध्ये 28 टक्के तर स्थानिक दहशतवाद्यांच्या भरतीमध्ये 40 टक्क्यांनी घट झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Amarnath Yatra: शिवभक्तांसाठी आनंदवार्ता..अमरनाथ यात्रा जुलैच्या 'या' तारखेपासून सुरू होतेय! इथल्या गुहेची आख्यायिका, यात्रेबद्दल संपूर्ण माहिती...
शिवभक्तांसाठी आनंदवार्ता..अमरनाथ यात्रा जुलैच्या 'या' तारखेपासून सुरू होतेय! इथल्या गुहेची आख्यायिका, यात्रेबद्दल संपूर्ण माहिती...
WhatsApp New Feature: Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
Whatsapp युजर्ससाठी मोठी अपडेट! फोननंबर शेअर न करता साधता येणार संवाद, व्हॉट्सअ‍ॅवर युझरनेम फीचर सुरू
Mukesh Khanna Reacted On Ayodhya Ram Mandir Donation Scam: 'हे फक्त भक्तांनाच नाही, देवालाही लुटतायत...'; अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळ्यावर 'शक्तिमान' फेम अभिनेता चिडला, लिहिलीय लांबलचक इन्स्टा पोस्ट
'हे फक्त भक्तांनाच नाही, देवालाही लुटतायत...'; अयोध्येतील राम मंदिरातील देणगी घोटाळ्यावर 'शक्तिमान' फेम अभिनेता चिडला, लिहिलीय लांबलचक इन्स्टा पोस्ट
Delimitation Bill : पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणणार; TMC, शिवसेना फुटीनंतर दोन तृतीयांश बहुमतासाठी आशावादी
पावसाळी अधिवेशनात मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणणार; TMC, शिवसेना फुटीनंतर दोन तृतीयांश बहुमतासाठी आशावादी

व्हिडीओ

Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report
Uddhav Thackeray Tour In Reble MP Constituency : दौरे आणि बोल, डॅमेज की कंट्रोल? | Special Report
Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis : फडणवीसांचं 'हित', ठाकरे 'चिंतक' | Special Report
Uddhav Thackeray Shirdi : काहींच्या नसा-नसांत गद्दारी भरली, भाऊसाहेब वाकचौरेंवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nasrapur Case Crime news: चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
चिमुरडीची आजीसोबत राम मंदिरात पूजा, आंघोळ करुन भरपेट खाल्लं अन् तासाभरात होत्याचं नव्हतं झालं, नसरापूरमध्ये काय-काय घडलं?
Bollywood Movie Story: वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?
Ketan Agrawal Lohagadh Case Pune: सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
सिया, चेतन सोडा, आता साहिल गोयलभोवती तपासाची चक्रं फिरणार; केतन अग्रवाल प्रकरणात ट्विस्ट, नेमकं काय घडलं?
Pune Nasrapur Case Bhimrao Kamble: कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
कोर्टाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली, पण भीमराव कांबळेला प्रत्यक्षात कधी लटकवणार?; अजमल कसाबला 4 वर्षांनी झालेली फाशी
Chandrashekhar Kulkarni Passes Away: ज्येष्ठ पत्रकार, संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांचं निधन
Chandrashekhar Kulkarni Passes Away: ज्येष्ठ पत्रकार, संपादक चंद्रशेखर कुलकर्णी यांचं निधन
Maharashtra Rain Alert : मुंबईसह उपनगरात मुसळधार, कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईसह उपनगरात मुसळधार, कोकणात सर्वदूर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी, राज्यातील 23 जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट, हवामान विभागाचा अंदाज काय?
Vishwas Nangare Patil: विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच शहरात धक्कादायक घडलं, परिसरात खळबळ
विश्वास नांगरे पाटील यांनी नागपूरच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताच शहरात धक्कादायक घडलं, परिसरात खळबळ
NCP Crisis: ठाकरे गटानंतर आता शरद पवारांच्या पक्षात राजकीय भूकंपाचे संकेत, दोन गट पडल्याने टेन्शन वाढलं
ठाकरे गटानंतर आता शरद पवारांच्या पक्षात राजकीय भूकंपाचे संकेत, दोन गट पडल्याने टेन्शन वाढलं
Embed widget