नवी दिल्ली : दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्राला केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीने महाराष्ट्रासह सहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशाला 7 हजार 214.03 कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची घोषणा केली आहे. यानुसार केंद्र सरकारने महाराष्ट्राला 4 हजार 714.28 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे.


पूर, भूस्खलन, ढगफुटी, गाजा वादळ आणि 2018-19 मधील दुष्काळग्रस्त सहा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशांना केंद्राकडून अतिरिक्त निधी देण्यासंदर्भात आज उच्चस्तरीय समितीची बैठक झाली. केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल, कृषीमंत्री राधामोहन सिंह तसंच गृह, अर्थ, कृषी विभाग आणि नीती आयोगाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

कोणत्या राज्याला किती मदत?
महाराष्ट्र : 4714.28 कोटी (दुष्काळ)
कर्नाटक : 949.49 कोटी रुपये (दुष्काळ)
आंध्र प्रदेश : 900.40 कोटी रुपये (दुष्काळ)
हिमाचल प्रदेश : 317.44 कोटी रुपये (पूर आणि भूस्खलन)
उत्तर प्रदेश : 191.73 कोटी रुपये (पूर)
गुजरात : 127.60 कोटी रुपये (दुष्काळ)
पद्दुचेरी : 13.09 कोटी रुपये (वादळ)