एक्स्प्लोर
Advertisement
गव्हर्नरपदासाठी केंद्राकडून चार नावं शॉर्टलिस्ट
मुंबई : 'रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया'चे गव्हर्नर म्हणून रघुराम राजन यांच्यानंतर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. गव्हर्नरपदासाठी केंद्र सरकारने चार जणांची नावं शॉर्टलिस्ट केल्याची माहिती आहे.
गव्हर्नरपदाची दुसरी टर्म स्वीकारणार नसल्याचं रघुराम राजन यांनी स्पष्ट केल्यानंतर पदाची सूत्रं सांभाळण्यासाठी नव्या अधिकाऱ्याचा शोध सुरु झाला. आरबीआयचे विद्यमान उपगव्हर्नर उर्जित पटेल, आरबीआयचे माजी उपगव्हर्नर राकेश मोहन, सुबिर गोकर्ण आणि देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांचा पदासाठी विचार होत असल्याचं म्हटलं जात आहे.
गव्हर्नरपदासाठी चौघांसोबतच विजय केळकर, अशोक लाहिरी आणि अशोक चावला या तिघांच्या नावांची चर्चा होती.
आरबीआयची दुसरी टर्म स्वीकारणार नाही: रघुराम राजन
येत्या 4 सप्टेंबर 2016 रोजी राजन यांचा कार्यकाळ संपत आहे. रघुराम राजन यांच्या या निर्णयाला भाजप नेत्यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांची पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे. आरबीआयच्या गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर शिक्षण क्षेत्रात परतणार असल्याचे रघुराम राजन यांनी सांगितले. देशाला जेव्हा माझी गरज असेल, तेव्हा मी मदतीसाठी तयार असेन, असेही राजन म्हणाले.रघुराम राजनवरून अमर्त्य सेन यांची मोदी सरकारवर टीका
गेल्या काही दिवसांपासून रघुराम राजन यांच्याविरोधात भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी टीकेची झोड उठवली आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी ज्या पद्धतीने व्याजदरांमध्ये कपात करण्याची गरज होती, तसं राजन यांनी केलं नाही, असा आरोप स्वामी यांनी केला होता.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement