Farmers Protest : शेतकरी आणि केंद्र सरकारमध्ये बैठकांच्या तीन फेऱ्या झाल्या. मात्र, या बैठकांमध्ये एकमत होऊ शकले नाही. यानंतर आज पुन्हा एकदा शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये चर्चेची चौथी फेरी होणार आहे. अशा स्थितीत या बैठकीत तोडगा निघेल, अशी आशा आहे.


 


दिल्लीला निघालेल्या शेतकऱ्यांना पंजाब-हरियाणा सीमेवर थांबवण्यात आलंय


आपल्या मागण्यांसाठी शेतकरी पुन्हा एकदा आंदोलन करत आहेत. दिल्लीकडे कूच करण्यासाठी निघालेल्या शेतकऱ्यांना पंजाब-हरियाणा सीमेवर थांबवण्यात आले आहे, जिथे शेतकरी तळ ठोकून आहेत. शेतकरी आणि सरकारमध्ये बैठकांच्या तीन फेऱ्या झाल्या. मात्र, या बैठकांमध्ये एकमत होऊ शकले नाही. यानंतर रविवारी म्हणजेच आज पुन्हा एकदा शेतकरी आणि केंद्रीय मंत्र्यांमध्ये चर्चेची चौथी फेरी होणार आहे. अशा स्थितीत या बैठकीत तोडगा निघेल, अशी आशा आहे.


 


तीन मागण्यांवर हे प्रकरण अडकले


यापूर्वी 8, 12 आणि 15 फेब्रुवारी रोजी शेतकरी नेते आणि सरकार यांच्यात बैठका झाल्या, मात्र त्यात यश आले नाही. कारण, पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) हमी देण्याच्या त्यांच्या मागणीवर शेतकरी ठाम राहिले. सरकारने शेतकऱ्यांच्या 10 मागण्या मान्य केल्या आहेत. तीन मागण्यांवर हे प्रकरण अडकले आहे. म्हणजेच किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी कायदा, शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि ६० वर्षांवरील शेतकऱ्यांना पेन्शन यावर एकमत होऊ शकले नाही.


 


केंद्रीय कृषिमंत्र्यांकडून लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन


केंद्रीय कृषिमंत्री अर्जुन मुंडा यांनीही रविवारी शेतकरी संघटनांसोबतच्या बैठकीत काहीतरी तोडगा निघेल, अशी आशा व्यक्त केली आहे. यावर लवकरच तोडगा काढू, असे ते म्हणाले. अशा परिस्थितीत केंद्र सरकार शेतकऱ्यांना एमएसपीवर समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव देऊ शकते, अशीही चर्चा आहे. मात्र, याला मान्यता मिळणार की नाही? शेतकरी दिल्लीकडे मोर्चा काढण्यावर ठाम राहणार की घरी परतणार? या प्रश्नांची उत्तरे आता आजच्या बैठकीनंतरच मिळतील.


 


शेतकऱ्यांचा आरोप काय?


हरियाणा पोलिसांनी शंभू सीमेवर हल्ला केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी पोलिसांवर केला. त्याचवेळी हरियाणा पोलिसांनी स्वतः असे व्हिडीओ जारी केले आहेत ज्यात शेतकरी हिंसाचार करताना दिसत आहेत. संयुक्त किसान मोर्चाने केंद्र आणि शेतकरी यांच्यात होणाऱ्या बैठकांचाही समाचार घेतला असून, केंद्र सरकार शंभू सीमेवर आंदोलक शेतकऱ्यांशी 'गुप्त चर्चेसाठी' मंत्र्यांना पाठवत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.


 


हेही वाचा>>>


Farmer Protest : आंदोलक शेतकऱ्यांकडून पोलिसांवर दगडफेक, सुरक्षा जवानांना चिथावणी देण्याचाही प्रयत्न? पोलिसांचा दावा, व्हिडीओ केला शेअर