एक्स्प्लोर

Coronavirus : कोरोनामुक्त झाल्यानंतर 2 ते 6 आठवडे काळजी घेणं गरजेचं; लहान मुलांमध्ये पुन्हा आढळतायत काही लक्षणं

Coronavirus : कोरोनामुक्त झाल्यानंतरही पुढचे 2 ते 6 आठवडे काळजी घेणं गरजेचं असतं. कारण काही लहान मुलांमध्ये कोरोनामुक्त झाल्यानंतरही कोरोनाची लक्षणं आढळून आली आहेत.

Coronavirus : सध्या भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. देशातील दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असली तरी वाढता मृत्यूचा आकडा हा धडकी भरवणारा आहे. अशातच दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावातच अनेक तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातही इशारा दिला आहे. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं आवश्यक त्या उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. 

नीति आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्यापैकी अनेक मुलांमध्ये कोरोनाची लक्षण दिसून आलेली नाहीत. तर एकूण कोरोनाबाधित लहान मुलांपैकी केवळ 2 टक्के मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता भासली. तसेच या मुलांमध्ये काही लक्षणं प्रामुख्यानं पाहायला मिळत आहेत, ती म्हणजे, ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास. या लक्षणांवर उपचार केले जात आहेत, असंही डॉ. पॉल यांनी सांगितलं.

दरम्यान, काही मुलांमध्ये नवी लक्षणंही दिसून येत आहेत. डॉ. पॉल म्हणाले की, कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेक लहान मुलांमध्ये 2 ते 6 आठवड्यांमध्ये ताप, त्वचेवर खाज येणं, डोळे लाल होणं, जुलाब, उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होणं, यांसारखी लक्षणं दिसून येत आहेत. डॉ. पॉल यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा मुलांमध्ये कोरोना व्हायरस आढळून आलेला नाही, पण त्यांच्यात आढळून आलेली लक्षणं ही कोरोनाप्रमाणेच आहेत. अशा लक्षणांना Multi System Inflammatory Syndrome असं म्हटलं जातं. 

समिती गठीत 

सरकारनं लहान मुलांमधील ही लक्षणं लक्षात घेऊन एक समिती तयार केली आहे. ही समिती या सर्व लक्षणांचा अभ्यास करत आहे. डॉ. वीके पॉलने सांगितलं की, समिती लवकरच लहान मुलांमध्ये दिसून येणाऱ्या या लक्षणांसाठी गाईडलाइन्स जारी करणार आहे. दरम्यान, त्यांनी हे स्पष्ट केलं की, लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या या लक्षणांवर उपचार उपलब्ध आहेत. त्यांनी सांगितलं की, लहान मुलांमध्ये आढळून येणाऱ्या लक्षणांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून व्यवस्था सुदृढ केली जात आहे. 

महाराष्ट्रात एकाच जिल्ह्यातील 8 हजार मुलं कोरोनाच्या विळख्यात

महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करतोय. पण अशातच आणखी एक धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात ज्या लहान मुलांना कोरोनाची बाधा झाली होती, त्याची आकडेवारी समोर आली आहे. जी अत्यंत धक्कादायक आहेत. महाराष्ट्र सरकारनं जारी केलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर लक्षात येईल की, केवळ अहमदनगर जिल्ह्यामध्ये मे महिन्यात जवळपास आठ हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. 

महाराष्ट्र सरकारनं कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेत, राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी कोरोना वॉर्ड तयार करण्याची तयारी सुरु केली आहे. सांगली शहरातील रुग्णालयात लहान मुलांसाठी स्पेशल कोरोना वॉर्डही तयार करण्यात आला आहे. येथे सध्या पाच मुलांना कोरोनाची लागण झाली असून ते या स्पेशल वॉर्डमध्ये कोरोनावर उपचार घेत आहेत. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Maharashtra Corona : महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट? एकाच जिल्ह्यातील 8 हजार मुलं कोरोनाच्या विळख्यात

महत्त्वाच्या बातम्या

'बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
बॉर्डर' चित्रपटानं बदललं आयुष्य! तब्बल 13 वेळा अपयश येऊनही लढला, शेवटी अधिकारी होऊनच बाहेर पडला
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
साखरेच्या दरात नेमकी का होतेय वाढ? दरवाढीमागं इथेनॉल हेच कारण आहे का? सरकारनं प्रथमच दिलं स्पष्टीकरण
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल

व्हिडीओ

Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Swati Khanna : लंडनमध्ये शिक्षण, दिल्ली हायकोर्टात वकिली, राहुल गांधींसोबत संसदमार्ग पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, कोण आहेत स्वाती खन्ना?
 राहुल गांधी आणि साहिलसोबत ठिय्या आंदोलनात दिवसभर उपस्थिती, वकील स्वाती खन्ना कोण आहेत?
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
ISRO कडून ऑर्डर मिळताच संरक्षण आणि एरोस्पेस पेनी स्टॉकला अप्पर सर्किट, जाणून घ्या
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयआर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
Embed widget