पणजी : गोव्यात आलेल्या प्रत्येकाने गोव्याची संस्कृती आत्मसात केली पाहिजे, आम्हाला बिहारचे गुन्हेगार गोव्यात नकोत असं वक्तव्य गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. गोव्यात होणाऱ्या गुन्ह्यांमुळे, त्यातील बिहारच्या गुन्हेगारांच्या सहभागामुळे बिहारचेच नाव खराब होते असंही ते म्हणाले. बिहार दिनाच्या निमित्ताने पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं.


दरवर्षी 22 मार्च हा दिवस 'बिहार दिन' म्हणून साजरा केला जातो. बिहारसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण या दिवशी राज्याचा वर्धापन दिन म्हणजे बिहार दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाच्या बिहार दिनाचा उत्साह गोव्यात देखील पाहायला मिळाला. गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बिहार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी यांनी बिहारी नागरिकांना बिहार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. 


गोव्याची संस्कती जपा


यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सर्व बिहारी नागरिकांना गोव्याची संस्कृती जपण्याचे आणि पालन करण्याचे आवाहन केले. गोव्यातील लोक सर्व धर्म समभावाने राहतात. आम्हाला गोव्यात बिहारचा गुन्हेगार नको आहे. गुन्हेगारातील सहभागामुळे बिहारचेच नाव खराब होते.


गोवा मुक्तिसंग्रामाच्या लढ्यामध्ये देशातील इतर राज्यांप्रमाणेच बिहारमधूनही स्वातंत्र्यसैनिक आले होते. त्यांचे योगदान आम्ही विसरू शकत नाही असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. 


या आधी, गेल्या वर्षी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बिहारच्या स्थलांतरित कामगारांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. गोव्यातील 90 टक्के गुन्हे हे बिहारी आणि उत्तर प्रदेशातील लोकांमुळे होतात असं ते म्हणाले होते. 


ही बातमी वाचा: