एक्स्प्लोर

‘बंच ऑफ थॉट्स’चे विचार तत्कालीन, आता संयुक्तिक नाहीत : भागवत

अस्पृश्यतेच्या समर्थनासह अनेक गोष्टी ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकात आहेत. मात्र आतापर्यंत संघाकडून कुणीही थेटपणे याबाबत भाष्य केलेलं नव्हतं.

नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा ज्यांच्या मार्गदर्शनानं पुढे गेली, त्या डॉ. गोळवलकर लिखित ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकापासून संघानं पहिल्यांदाच स्वतःला दूर केलंय. त्या पुस्तकातले संदर्भ तत्कालीन होते, ते विचार आता संयुक्तिक नाहीत, असे दस्तुरखुद्द सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले आहेत. अस्पृश्यतेच्या समर्थनासह अनेक गोष्टी ‘बंच ऑफ थॉट्स’ या पुस्तकात आहेत. मात्र आतापर्यंत संघाकडून कुणीही थेटपणे याबाबत भाष्य केलेलं नव्हतं. काल दिल्लीत ते बोलत होते. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने व्याख्यानमालेचं आयोजन केलं होतं. काल त्याचा शेवटचा दिवस होता. बंच ऑफ थॉट्सवर मोहन भागवत नेमकं काय म्हणाले? “बंच ऑफ थॉट्समधील विचार परिस्थितीजन्य, त्यावेळच्या प्रसंगांच्या संदर्भात आहेत. त्या गोष्टी शाश्वत राहत नाहीत. मात्र, गुरुजींचे जे शाश्वत विचार आहेत, त्यांचं संकलन करुन ‘श्री गुरुजी : व्हिजन अँड मिशन’ पुस्तक प्रसिद्ध कले आहे. त्यामध्ये तत्कालीन सर्व गोष्टी वगळून सर्व काळासाठी उपयुक्त विचार ठेवण्यात आले आहेत. ते तुम्ही वाचा. त्यामधून सर्व गोष्टी तुम्हाला कळून जातील.”, असे मोहन भागवत म्हणाले. याच कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षण, एससी-एसटी अॅक्टसह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. भागवत नेमकं काय म्हणाले आरक्षणावर? “सामाजिक विषमता नाहीशी करुन, सर्वांना समान संधी मिळावी म्हणून घटना बनवली गेलीय. घटनेने आरक्षणाची जी व्यवस्था तयार केलीय, तिला संघाचं पूर्ण समर्थन आहे. आता हे आरक्षण कधीपर्यंत ठेवायचं हे त्यांनीच ठरवायचंय, ज्यांना लाभ मिळतोय. जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा ते क्रिमीलेयरचं काय करायचं ते ठरवतील. आरक्षण समस्या नसून, आरक्षणावरील राजकारण ही समस्या आहे. जे खड्ड्यात पडले आहेत, त्यांच्या हातात हात देऊन आपण वर आणलं पाहिजे. एक हजार वर्षांपासूनचा अन्याय दूर करण्यासाठी 100-150 वर्षे झुकून राहावं लागलं, तर ती मोठी गोष्ट नाही. सर्वच आपले आहेत.”, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. एससी-एसटी अॅक्टवर काय म्हणाले भागवत? “जी परिस्थिती आहे, ती दूर करण्यासाठी कायदा बनवला गेलाय. त्या कायद्याला नीट लागू केला पाहिजे. त्याचा दुरुपयोग व्हायला नको. सद्भावना निर्माण करण्याची मोठी गरज आहे. संघाची इच्छा अशीय की, सामाजिक सद्भावाने या गोष्टी सोडवल्या पाहिजेत.”, असे एससी-एसटी अॅक्टवर बोलताना मोहन भागवत म्हणाले.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
मोठी बातमी, पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
Israel Iran Conflict : अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 
अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Share Market: सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 
सेन्सेक्समध्ये 900 अंकांची उसळी, गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी कमावले,शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक
Embed widget