BJP kirit Somaiya On CM Uddhav Thackeray : भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दिल्लीमध्ये खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. किरीट सोमय्या यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे यांना दोनच गाल आहेत. किती वेळा चपराक देणार कोर्ट. बघा कसे गाल सुजले आहेत. पोलीस प्रशासनाचा वापर सरकार माफियाप्रमाणे करत आहे. हा चिंतेचाच विषय आहे. माफियांना आम्ही ठिकाणावर आणणार असंही सोमय्या यांनी म्हटलं आहे. 


किरीट सोमय्या म्हणाले की, पोलीस कमीशन संजय पांडे यांचा वापर उद्धव ठाकरे सरकार माफियाप्रमाणे करत आहे.  आता ते माफिया पोलीस कमीशनर कुठे आहेत? संजय पांडे साहेब, हिंमत असेल सुप्रीम कोर्टाला जाब विचारा. राजद्रोहाचं कलम सुप्रीम  कोर्टानं निरस्त केलं. आता उद्धव ठाकरे सरकार काहीही करू शकत नाही, असं किरीट सोमय्या म्हणाले.


सोमय्या यांनी म्हटलं आहे की, सरकारनं हद्द केली आहे. खासदार आणि आमदारांना धमकी घेतात. वीस फुट खड्ड्यात गाढण्याची भाषा फक्त माफिया सरकार करू शकते. सोमय्या यांनी म्हटलं की, मी स्वतः लोकसभा अध्यक्षांना भेटून ठाकरे सरकारच्या या माफियागिरीबद्दल तक्रार करणार आहे. गृहसचिवांचीही भेट घेतली आहे. उद्धव ठाकरेंच्या माफिया सरकारचा अंत झाल्यानंतरच आम्ही स्वस्थ बसणार आहोत, असं ते म्हणाले. 


त्यांनी म्हटलं की, हिंदुस्थानचे कोट्यवधी लोक हनुमानाची पूजा करतात. आम्ही हनुमान भक्त जेव्हा रावण पैदा होतात, त्यांच्या लंकेला जाळूनच टाकतो. त्यामुळे उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी हनुमान चालिसा बंद करावी, असा इशारा सोमय्यांनी दिला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


योगी सरकारचं मुंबईत कार्यालय होणार; संजय राऊत म्हणाले, आम्हीही अयोध्या, लखनौ, वाराणसीमध्ये...


Sanjay Raut : 'किरीट का कमाल' म्हणत संजय राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल; NSEL घोटाळ्याचा उल्लेख करत नवा आरोप