एक्स्प्लोर

नितीशकुमार सीएम अरविंद केजरीवालांच्या भेटीला; सुप्रीम कोर्टाचा आदेश फिरवून अध्यादेश आणणाऱ्या मोदी सरकारविरोधात केजरीवालांनी मागितला पाठिंबा

Arvind Kejriwal: बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (21 मे) रविवारी राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. या दोघांमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली.

CM Nitish Kumar meets Delhi CM Arvind Kejriwal: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या एकजुटीच्या तयारीला वेग आला आहे. याच रणनीतीचा भाग असलेल्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज (21 मे) रविवारी राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. दिल्लीमधील प्रशासकीय बदल्यांचे हक्क सुप्रीम कोर्टाने देऊनही मोदी सरकारने अध्यादेश आणून निर्णय फिरवला आहे. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी अध्यादेशाविरोधात नितीशकुमार यांच्याकडे समर्थन मागितले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही भेट झाली. दोन्ही नेत्यांच्या या भेटीतून विरोधी ऐक्याची ताकद दिसून आली. या बैठकीला बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह देखील उपस्थित होते. या बैठकीत विरोधकांच्या ऐक्यावर  चर्चा करण्यात आली.

अध्यादेशावर काय म्हणाले केजरीवाल?

दिल्लीत NCCSA स्थापन करण्याच्या केंद्र सरकारच्या अध्यादेशावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, "ममताजी (बंगालचे मुख्यमंत्री) यांच्यासोबत बैठक होणार आहे. त्यानंतर मी देशातील सर्व पक्षाध्यक्षांना भेटायला जाईन. आज मी देखील नितीशजींना सर्व पक्षांशी बोलण्याची विनंती केली. राज्यसभेत जेव्हा हे विधेयक येईल, तेव्हा मी प्रत्येक राज्यात जाईन आणि समर्थनासाठी सर्वांशी बोलेन.

आम्ही केजरीवाल यांच्यासोबत

यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय योग्य होता, पण असे असतानाही केंद्र सरकार जे काही करण्याचा प्रयत्न करत आहे ते विचित्र आहे. सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे. आम्ही केजरीवाल यांच्या सोबत आहोत. अधिकाधिक विरोधी पक्षांना एकत्र अभियान राबवावं लागेल. आम्ही पूर्णपणे केजरीवाल यांच्यासोबत आहोत.

भाजप कधीही दिल्लीत परतणार नाही

त्याचवेळी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले की, अरविंद केजरीवाल ज्या समस्यांना तोंड देत आहेत त्याविरोधात आम्ही केजरीवाल यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहोत. दिल्लीत भाजपचे सरकार असते तर उपराज्यपालांना असे काम करण्याची हिंमत असती का? भाजप दिल्लीत परत येणार नाही.

इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांचीही भेट होऊ शकते

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून मुख्यमंत्री नितीश कुमार शनिवारी बंगळूरहून दिल्लीत पोहोचले. विरोधकांच्या ऐक्याबाबत नितीशकुमार आज दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि इतर वरिष्ठ नेत्यांची बैठक घेणार असल्याची चर्चा आहे.कर्नाटकातील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या विरोधी एकजुटीच्या पुढाकाराचे जोरदार कौतुक करण्यात आले होते. नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव शनिवारीच पाटणा येथून शपथविधी सोहळ्याला पोहोचले होते. सोहळ्यात राहुल गांधी आणि प्रियाका यांनी नितीश कुमार यांना शुभेच्छा दिल्या.

महत्त्वाची बाब म्हणजे राहुल गांधींच्या जवळ उभे असलेले काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नितीशकुमार यांना त्यांच्या शेजारी बसवले. नितीश कुमार यांची व्यासपीठावर राहुल गांधींच्या जवळ बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यांच्या विरोधी एकजुटीच्या पुढाकाराची चर्चा झाली. त्यामुळे पाटण्यात विरोधी पक्षांच्या बैठकीची संयुक्तपणे तारीख लवकरच जाहीर होणार असल्याचे संकेत आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget