Bharat Band Breaking News LIVE Updates : आज भारत बंदची हाक, राज्यासह देशभरातील अपडेट एका क्लिकवर...

Bharat Bandh Live Updates : रस्ते, वाहतूक आणि उर्जा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनीही संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. भारत बंदशी संबंधित प्रत्येक क्षणाच्या अपडेट्ससाठी एबीपी माझाला फॉलो करा..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Mar 2022 02:36 PM
संपाच्या दुसऱ्या दिवशी महावितरणच्या कल्याण झोन मधील दीड हजार कर्मचारी संपात सहभागी

महावितरणच्या कामगार संघटनाकडुन महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांच्या खासगीकरण व विभाजनाला विरोध करत दोन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण मधील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला. कल्याण झोन मधील तब्बल दीड हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत .आज दुसऱ्या दिवशी देखील महावितरणच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. या तिन्ही कंपन्यांच्या खासगीकरणाला कर्मचाऱ्यांनी विरोध केला. दरम्यान उपलब्ध कर्मचारी व कंत्राटी कामगारांच्या  मदतीने कामकाज सुरू असल्याने वीज पुरवठा सेवा सुरळीत असल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले .

संपाच्या दुसऱ्या दिवशी महावितरणच्या कल्याण झोन मधील दीड हजार कर्मचारी संपात सहभागी

महावितरणच्या कामगार संघटनाकडुन महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांच्या खासगीकरण व विभाजनाला विरोध करत दोन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण मधील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला. कल्याण झोन मधील तब्बल दीड हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत .आज दुसऱ्या दिवशी देखील महावितरणच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. या तिन्ही कंपन्यांच्या खासगीकरणाला कर्मचाऱ्यांनी विरोध केला. दरम्यान उपलब्ध कर्मचारी व कंत्राटी कामगारांच्या  मदतीने कामकाज सुरू असल्याने वीज पुरवठा सेवा सुरळीत असल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले .

बँक खासगीकरणाला विरोध या मागणीसाठी आजचा संप, संघटनांच्या नेत्यांनी केले स्पष्ट


मुंबईच्या आझाद मैदानात सरकारी आणि जुन्या खासगी बॅंकेचे कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. हा संप कुठल्याही आर्थिक मागणीसाठी किंवा सेवाशर्तीत सुधारासाठी नाही तर केवळ बँक खासगीकरणाला विरोध या मागणीसाठी असल्याचे संघटनांच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे. 

भारत बंदमध्ये राज्यातील 65 टक्के वीज कर्मचारी सहभागी

भारत बंदमध्ये राज्यातील 65 टक्के वीज कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. केवळ 35 टक्केच कर्मचारी कामावर पोहोचले आहेत. मुख्य वीजप्रवाहात तांत्रिक 
सध्या सर्व यंत्रणा सुरळीत सुरू असल्यामुळे काही अडचण नाही.  मात्र अडचण आली तर याचा राज्यभरातील जनतेवर मोठा परिणाम दिसणार आहे.

वर्ध्यात अनेक कामगार, कर्मचारी संघटनांचा देशव्यापी संप

वर्ध्यात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन, पोस्ट विभाग, बँक कर्मचारी, वीज कर्मचारी, महसूल विभाग या सर्व कर्मचाऱ्यांनी आपापल्या कार्यालयासमोर धरणे देत दोन दिवसीय राज्यव्यापी संप पुकारला आहे. यातील सिटू कर्मचारी मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर एकत्रित आले होते. पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी सर्व जीडीएस कर्मचाऱ्यांना सामुहिक विमा लागू करावा. ग्रामीण डाक सेवकांना खात्यात सामाविष्ठ करा आणि सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा,अशी मागणी केली, तर सिटूच्या वतीने आशा गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी योजना कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांचा दर्जा द्या,
शालेय पोषण आहार, अंशकालीन स्त्री परिचर आदींना योग्य मानधन वाढ आणि सेवेत कायम करा अशा मागण्या करण्यात येत आहेत.

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील संपकरी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील दापचरी सीमा तपासणी नाका येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने आज रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात शेकडो कार्यकर्ता व महिला रस्त्यावर उतरले असून काही वेळ महामार्ग बंद पाडण्यात आला आहे. गुजरात आणि मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, डहाणूचे आमदार विनोद निकोले यांच्या नेतृत्वात हा रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान काही वेळानंतर आमदार विनोद नीकोलेसह काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

महावितरणच्या कल्याण झोनमधील दीड हजार कर्मचारी संपावर

महावितरणच्या कामगार संघटनाकडून महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांच्या खासगीकरण आणि विभागजनाला विरोध करत दोन दिवसीय   राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याणमधील महावितरणच्या कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला. कल्याण झोन मधील तब्बल दीड हजार कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. महावितरणच्या कार्यालयासमोर आज कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. या तिन्ही कंपन्यांच्या खासगीकरणाला कर्मचाऱ्यांनी विरोध केला. दरम्यान उपलब्ध कर्मचारी आणि कंत्राटी कामगारांच्या मदतीने कामकाज सुरू असल्याने वीज पुरवठा सेवा सुरळीत असल्याचे महावितरण कडून सांगण्यात आले आहे.

वीज कर्मचाऱ्यांनो संप मागे घ्या; उर्जामंत्र्यांचं संपकऱ्यांना आवाहन

केंद्र सरकारच्या खासगीकरण धोरणाविरोधात देशभरातील वीज कर्मचाऱ्यांनी (Stike) संप पुकारला आहे. 28 आणि 29 मार्च रोजी सर्व वीज कर्मचारी संपावर (Power workers on strike) गेले आहेत. या संपात 39 संघटना सहभागी झाल्या आहेत. वीज कर्मचारी संपावर गेले असतानाच उर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच हा संप कर्मचाऱ्यांनी त्वरित मागे घ्यावा असे आवाहन केले आहे.

Jalgaon Strike : जळगाव जिल्ह्यात महावितरण कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती व महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना यांच्या वतीने आज खासगीकरणाच्या विरोधात दोन दिवसीय संप  पुकारण्यात आला आहे. .यामुळं महावितरणाच्या कार्यालयांमध्ये शुकशुकाट बघावयास मिळाला.  महावितरण महानिर्मिती महापारेषण यांच्यात सुरू करण्यात असलेले खाजगीकरणाला विरोध तसेच विद्युत संशोधन बिल 2021 केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात महानिर्मिती कंपनीच्या अधिकार क्षेत्रातील जलविद्युत केंद्रे खाजगी उद्योगांना देण्याचे धोरणाला विरोध, महावितरण महापारेषण महानिर्मिती कंपन्यातील रिक्त पदे भरण्यास होत असलेली दिरंगाई या विविध मागण्यांसाठी  जळगाव जिल्ह्यात महावितरणचे पाच हजार कर्मचारी रस्त्यावर उतरले असून त्यांनी संप पुकारला आहे.

चेन्नईमध्ये पोलिसांनी आंदोलकांना घेतले ताब्यात

चेन्नईतील कामगार संघटनांनी सरकारी धोरणांच्या निषेधार्थ आज आणि उद्या देशव्यापी संप आणि बंदची हाक दिली. यावेळी माउंट रोडवर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

लातूरमधील संपात 39 कर्मचारी संघटना एकत्र

लातूरमध्ये भारत बंदसाठी 39 कर्मचारी संघटनांनी एकत्र येत आंदोलन केले. बंदमध्ये राज्यभरातील 86 हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. विविध मागन्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवसाच्या वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. ऊर्जामंत्र्यांची संपकऱ्यांशी चर्चेचा होत नसल्यामुळे कर्मचारी आणखीनच संतप्त झाले आहेत. महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषणचे खासगीकरण करु नका, विद्युत बिल 2021 केंद्र सरकारच्या धोरणा विरोधात आहे, अशी संपकरी कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.

Nitin Raut Live : बारावीच्या परीक्षा सुरु आहेत, वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, कामगारांशी उद्या सकारात्मक चर्चा होऊन संप मागे घेतला जाईल- नितीन राऊत, उर्जामंत्री

Nitin Raut Live : बारावीच्या परीक्षा सुरु आहेत, वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, कामगारांशी उद्या सकारात्मक चर्चा होऊन संप मागे घेतला जाईल- नितीन राऊत, उर्जामंत्री

नागपुरात मुख्य कार्यालय असलेल्या विद्युतभवन समोर कर्मचारी आणि अभियंते संपावर
महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी अभियंता संघर्ष समितीने आजपासून वीज कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा 2 दिवसांचा संप पुकारला आहे.. नागपुरात या संपाला चांगला प्रतिसाद मिळत असून महावितरणचा मुख्य कार्यालय असलेल्या विद्युत भवन समोर कर्मचारी आणि अभियंते संपावर बसले आहेत... केंद्र सरकारच्या प्रस्तावित विद्युत संशोधन बिलाला आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.. तसेच महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागाने नुकतच महानिर्मितीच्या मालकीचे जलविद्युत प्रकल्प खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासही आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे.. महाराष्ट्रातील तिन्ही वीज कंपन्या चांगल्या पद्धतीने काम करत असताना ऊर्जा विभाग तिन्ही कंपन्यांच्या खाजगीकरणाचा डाव आखत असल्याचा संपावर जाणार या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे... केंद्र सरकारचा विद्युत संशोधन बिल अमलात आला तर खासगीकरणाची गती वाढेल आणि कर्मचाऱ्यांचा नुकसान होईल अशी भीती संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना आहे.. दोन दिवसांच्या संपा विरोधात राज्य सरकारने मेस्माचा हत्यार उपसला आहे... जर राज्य सरकार ने एकही कर्मचारी विरोधात मेस्मा अंतर्गत कारवाई केली.. तर सर्व कर्मचारी अनिश्चितकालीन संपावर जातील असा इशारा ही आंदोलनकर्त्यांनी दिला आहे....

 
7 हजार बँक शाखेतील 30 हजार कर्मचारी संपावर

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन सचिव देवीदास तुळजापूरकर यांनी प्रतिक्रिया देत सांगितले आहे की, ' 7 हजार बँक शाखेतील 30 हजार कर्मचारी संपावर आहेत. आयडीबीआय, बँक ऑफ महाराष्ट्र बँकेतील कर्मचारीही संपावर आहेत. कर्मचाऱ्यांचा बँक खाजगीकरणाला विरोध आहे. ठेवीची सुरक्षितता हवी असेल तर हे आंदोलन आवश्यक आहे.

आझाद मैदानात मोठ्या संख्येनं सरकारी, बँक कर्मचाऱ्यांचा संप

आझाद मैदानात मोठ्या संख्येनं सरकारी आणि जुन्या खासगी बँकेचे कर्मचारी एकत्र येत संपात सहभागी झाले आहेत. आज आणि उद्या बँक कर्मचारी एकत्रित येत आझाद मैदानात बँक आंदोलन करणार आहेत. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, ऑल इंडिया बँक एम्प्लाईज ऑफीसर असोसिएशन, बेफी संघटनांनी संपाला पाठिंबा दिला आहे.

अमरावती वीजवितरण कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांचं आंदोलन

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी अभियंता संघर्ष समितीने आजपासून वीज कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा दोन दिवसांचा संप पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरावती वीजवितरण कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे.

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांविना शुकशुकाट

नांदेड जिल्ह्यात महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कार्यालये ओस पडली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल विभागातही कर्मचाऱ्यांविना शुकशुकाट पाहायला मिळतोय

नाशिकच्या एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पातील कर्मचाऱ्यांचाही बंद, वीज निर्मिती रात्रीपासून बंद

केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांविरोधात वीज वितरण, पारेषण आणि निर्मिती या तिन्ही कंपन्याच्या कामगारांनी दोन दिवसीय संपाची हाक दिलीय. एकलहरे औष्णिक विद्युत प्रकल्पातील कर्मचारी ही यामध्ये सहभागी झाले आहेत. एकलहरे औष्णिक प्रकल्पातील 210 मेगाव्याटचे दोन प्रकल्प कार्यान्वित आहेत, मात्र या दोन्ही संचाची वीज निर्मिती रात्रीपासून बंद पडली आहे.

भारत बंदमध्ये बारामती औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांचा सहभाग

केंद्र सरकारच्या कामगार धोरणाविरोधात आज देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. त्यात संपात बारामती औद्योगिक वसाहतीतील कर्मचाऱ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला. या संपात बारामती MIDC मधील विविध कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या. केंद्र सरकारने प्रस्तावित केलेलं कामगार कायदे रद्द करावे या मागणीसाठी कामगारांनी प्रशासकीय इमारतीवर मोर्चा काढला होता. यासोबतच अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर देखील या संपात सहभागी झाल्या होत्या. आशा वर्कर यांना 10 हजार, अंगणवाडी सेविकाना 18 हजार तर मदतनीस यांना 15 हजार मासिक मानधन मिळावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. आशा वर्कर यांना सध्या 4 हजार, अंगणवाडी सेविका 8 हजार 500 आणि मदतनीस यांना 4 हजार 500 मानधन मिळत आहे. जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर एप्रिल महिन्यात बेमुदत संपावर जाण्याचा इशारा अंगणवाडी सेविकांनी दिलाय. या सर्व कामगारांनी बारामतीतील प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने केली. सोबतच राज्य आणि केंद्र सरकारच्या कामगार धोरणाचा निषेध करत घोषणाबाजी केली.

नागपुरात भारत बंदला चांगला प्रतिसाद, वीज कर्मचाऱ्यांनी पुकारला दोन दिवसीय संप

नागपुरात भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळत असून महावितरणचा मुख्य कार्यालय असलेल्या विद्युत भवन समोर कर्मचारी आणि अभियंते संपावर बसले आहेत. केंद्र सरकारच्या प्रस्तावित विद्युत संशोधन बिलाला आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. तसेच महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागाने नुकतच महानिर्मितीच्या मालकीचे जलविद्युत प्रकल्प खाजगी कंपनीला देण्याचा निर्णय घेतला आहे, त्यालाही आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. महाराष्ट्रातील तिन्ही वीज कंपन्या चांगल्या पद्धतीने काम करत असताना ऊर्जा विभाग तिन्ही कंपन्यांच्या खाजगीकरणाचा डाव आखत असल्याचा संपावर जाणार या कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.

उत्तर प्रदेशमध्ये वीज कर्मचाऱ्यांचा दोन दिवसीय संप

केंद्र सरकारच्या खाजगीकरण धोरणाच्या निषेधार्थ देशभरातील वीज कामगारांसह उत्तर प्रदेशमधील वीज कर्मचारी आज आणि उद्या संपावर जाणार आहेत. वीज कर्मचारी आणि अभियंत्यांच्या राष्ट्रीय समन्वय समितीच्या (NCCOEEE) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. संघटनेत सहभागी असलेल्या ऑल इंडिया पॉवर इंजिनीअर्स फेडरेशनचे अध्यक्ष शैलेंद्र दुबे यांनी सांगितले की, 'केंद्रीय कामगार संघटनांच्या भारत बंदच्या हाकेवर 28 आणि 29 मार्च रोजी देशातील सर्व राज्यातील सर्व वीज कामगारही संपात सहभागी होतील.'

कोलकात्याच्या जादवपूर रेल्वे स्थानकावर संपकऱ्यांनी ट्रेन अडवली

पश्चिम बंगालमधील विविध कामगार संघटनांनीही दोन दिवसीय देशव्यापी संप सुरू केला आहे. याच्या पार्श्वभूमीवर डाव्या आघाडीच्या सदस्यांनी कोलकात्याच्या जादवपूर रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने एकत्र येऊन रेल्वे ट्रॅकवर ठिय्या मांडून ट्रेन अडवली.






 

चंद्रपुरातील वीज कर्मचाऱ्यांचा आंदोलनात सहभाग

चंद्रपूर : आजपासून वीज कर्मचारी दोन दिवसीय संपावर आहेत. चंद्रपुरात सकाळपासून द्वारसभेच्या माध्यमातून आंदोलनाची सुरुवात झाली आहे. केंद्र सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत विद्युत संशोधन कायदा 2021 चा कडाडून विरोध केला. राज्यातील जलविद्युत केंद्रे खाजगी कंपन्यांना चालविण्यासाठी देण्यासाठी विरोध करण्यात येत असून प्रथमच नियमित आणि कंत्राटी वीज कर्मचारी संपावर गेले आहेत.

कारवाई करण्याच्या आदेशानंतरही 29 टक्के वीज कर्मचारी संपात सहभागी

राज्य सरकारने मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यातील वीज कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग घेतला आहे. राज्यातील 29 टक्के वीज कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदवला आहे. मात्र राज्यात सध्यातरी कुठेही वीजपुरवठा खंडीत झालेला नाही. आपल्या मागण्यांसाठी मध्यरात्री पासून कर्मचारी संपावर गेले आहेत. संपावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढली तर अडचण निर्माण होऊ शकते.

केंद्रीय कामगार संघटनांच्या दोन दिवसीय संपाला सुरूवात

केंद्रीय कामगार संघटनांचा दोन दिवसीय संपाला सुरूवात झाली आहे. सरकारी धोरणांच्या निषेधार्थ आज आणि उद्या देशव्यापी संप पुकारण्यात आला असून, यामध्ये वीज, वाहतूक, विमा यासह अनेक क्षेत्रात खासगीकरणाला विरोध करण्यात येणार आहे.






 

पार्श्वभूमी

Bharat Bandh 2022 : आज आणि उद्या भारत बंदची हाक देण्यात आली असून याचा परिणाम बँकिंग आणि वाहतुकीसह विविध सेवांवर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने या संपाला पाठिंबा दिला आहे. दोन दिवसाच्या या संपामुळे बँकिंगसह वाहतुकीसारख्या विविध सेवांना फटका बसणार आहे.  


केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात हा भारत बंद पुकारला आहे. मोदी सरकारच्या धोरणांचा कर्मचारी, शेतकरी आणि सर्वसामान्यांवर वाईट परिणाम होत आहे. या विरोधातच हा संप पुकारण्यात आला असून या संपात बँकिंग क्षेत्रही सहभागी होणार असल्याचे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने म्हटले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खासगीकरणाविरोधात आणि बँकिंग सुधारणा कायदा 2021 विरोधात या संघटना संपात सहभागी होणार आहेत.  


 

संपाबाबत 8 ठळक मुद्दे


1. केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त संघाची 22 मार्च 2022 रोजी दिल्ली येथे बैठक झाली. यामध्ये 28-29 मार्च 2022 रोजी विविध राज्ये आणि क्षेत्रातील दोन दिवसीय अखिल भारतीय संपाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. शासनाची धोरणे ही सर्वसामान्य जनता, कामगार आणि शेतकरी विरोधी असल्याचे निवेदनात म्हटले आहे.









 


2. निवेदनात म्हटले आहे की, वाहतूक परिवहन आणि वीज कर्मचाऱ्यांनी संपात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे.


३. वीज कर्मचारीही या संपात सहभागी होणार आहेत. परंतु, राज्य सरकारने वीज कर्मचाऱ्यांना मेस्सा लागू केला असून राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना प्रस्तावित संप करण्यास मनाई करण्यात आली आहे. महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण यांच्या कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षा अधिनियम अर्थात मेस्मा लागू करण्यात आला आहे. 


4. बँकिंग आणि विम्यासह आर्थिक क्षेत्र देखील या संपाला पाठिंबा देणार आहेत.


5. कोळसा, पोलाद, तेल, दूरसंचार, टपाल, आयकर, तांबे, बँका, विमा यांसारख्या क्षेत्रातील संघटनांनाही संपात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


6. SBI ने सांगितले आहे की, संपामुळे बँकिंग सेवांवर परिणाम होऊ शकतो. मात्र, बँकेच्या शाखा आणि कार्यालयांमध्ये नियमित कामकाज सुनिश्चित करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असल्याचं एसबीआयने म्हटले आहे. 


7. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करण्याचा सरकारचा निर्णय आणि बँकिंग कायदे दुरुस्ती विधेयक-2021 च्या निषेधार्थ हा संप करण्यात येत आहे.


8. देशभरातील शेकडो ठिकाणी रेल्वे आणि संरक्षण क्षेत्रातील संघटना संपाच्या समर्थनार्थ बंद करणार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.