2007 मध्ये बीडीएसची परीक्षा पूर्ण झाल्यानंतर नॅशनल कॉन्फरन्समध्ये प्रेझेंटेशनसाठी राजलक्ष्मी चेन्नईला जात होती. त्यावेळी रस्त्यात तिला भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तिला स्पायनल इंज्युरी झाली होती आणि तिच्या पायाला अर्धांगवायू झाला.
नियतीपुढे हात टेकण्याऐवजी राजलक्ष्मीने मानसशास्त्र आणि फॅशन या विषयातील आपली आवड वाढवली. मिस व्हीलचेअर इंडिया स्पर्धेविषयी माहिती मिळाल्यानंतर तिने त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. मिस व्हीलचेअरचा मुकूट पटकावणं तिच्यासाठी स्वप्नवत होतं. आता जागतिक पातळीवर देशाचं नेतृत्व करण्याची संधी तिला मिळाली आहे.
राजलक्ष्मीने काही शाळांमध्ये मोफत डेन्टल चेक अप कॅम्प आयोजित केले होते. व्हीलचेअर ट्रेनिंगसाठीही ती मदत करते. फॅशन इंडस्ट्रीसोबतच ती व्हीलचेअर बास्केटबॉल आणि व्हीलचेअर डान्समध्येही सहभागी झाली आहे.