एक्स्प्लोर

ADR Report: 30 पैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश, जगन मोहन रेड्डी 510 कोटींचे मालक तर ममता बॅनर्जींची संपत्ती 15 लाख 

ADR Report: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संपत्ती 12 कोटींच्या आसपास असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची संपत्ती ही तीन कोटी रुपये इतकी आहे. 

मुंबई: देशातील 30 पैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश असून आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) हे सर्वाधिक श्रीमंत म्हणजे 510 कोटी रुपयांची संपत्ती असणारे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची संपत्ती 12 कोटीच्या जवळपास आहे. तर या यादीत 15 लाख इतकी सर्वाधिक कमी संपत्ती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची आहे. निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रकात या गोष्टी नमूद असून त्यावरुन एडीआरने  (Association for Democratic Reforms ADR) एक अहवाल तयार केला आहे. 

देशातील 28 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीची माहिती ADR ने आपल्या अहवालात दिली आहे. यामध्ये 30 मुख्यमंत्र्यांपैकी 29 मुख्यमंत्री हे कोट्यधीश आहेत. या सर्व मुख्यमंत्र्यांची सरासरी संपत्ती ही 33.96 कोटी रुपये इतकी आहे. 

ADR Report 29 CM Crorepati  : टॉप थ्री श्रीमंत मुख्यमंत्री 

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची संपत्ती 510 कोटी रुपये असून ते सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यानंतर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री प्रेमा खांडू यांचा क्रमांक लागत असून त्यांची संपत्ती ही 163 कोटी रुपये इतकी आहे. त्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक असून त्यांची संपत्ती 63 कोटी रुपये इतकी आहे. 

सर्वात कमी संपत्ती असणारे मुख्यमंत्री 

या अहवालानुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची संपत्ती ही सर्वात कमी असून ती केवळ 15 लाख रुपये इतकी आहे. त्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांची संपत्ती ही एक कोटी रुपये आहे, तर हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांची संपत्ती ही एक कोटी रुपयांच्या वर आहे. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind  Kejriwal) यांची संपत्ती ही प्रत्येकी तीन कोटी रुपये असल्याचं या अहवालात सांगण्यात आलं आहे. 

13 मुख्यमंत्र्यांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद 

ADR च्या अहवालानुसार, 30 मुख्यमंत्र्यांपैकी 13 मुख्यमंत्र्यांवर गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि अशा इतर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. हे गुन्हे अजामीनपात्र गुन्हे असून यामध्ये जर दोषी सापडले तर संबंधिताला पाच वर्षांपेक्षा अधिकचा तुरुंगवास भोगावा लागेल. 

ही बातमी वाचा: 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Embed widget