नवी दिल्ली : इराकमध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली. डीएनए टेस्ट केल्यानंतर मृतदेहांची ओळख पटली असून 39 मृतदेहांचे 70 टक्के नमुने जुळले आहेत, असं सुषमा स्वराज म्हणाल्या.


सुरुवातीला इराकमधून अपहरण झालेले भारतीय जिवंत असल्याचा दावा सरकारने केला होता. सुषमा स्वराज यांनी अपहृत भारतीयांच्या नातेवाईकांची स्वत: भेट घेतली होती.  शिवाय 39 भारतीयांचा शोध घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करु, असं आश्वासनही त्यांनी दिलं होतं.

काय आहे प्रकरण?

2014 मध्ये इराकमधील मोसूल भागातून जून महिन्यात आयसिस या दहशतवादी संघटनेने 40 भारतीयांचं अपहरण केलं होतं. या 40 जणांपैकी एकटा हरजीत मसीहची सुखरुप सुटका झाली होती. मात्र या 39 भारतीयांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नव्हती.

एबीपी न्यूजने 39 भारतीयांचं नक्की काय झालं याबाबतचं एक वृत्त दाखवल्यानंतर संसदेत याबाबत मोठी चर्चा झाली. यावर सुषमा स्वराज यांनी संसदेत वेळोवेळी स्पष्टीकरणही दिलं होतं.

तर दहशतवाद्यांनी माझ्यासमोर या 39 जणांना मारलं, असा दावा या हरजीत मसीहने केला होता. अखेर या सगळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आज सुषमा स्वराज यांनी आज राज्यसभेत दिली.

संबंधित बातम्या

'ते' 39 भारतीय जिवंत, 'पाकिस्तान तालिबान' दहशतवादी संघटनेचा द संडे गार्डियन वृत्तपत्राकडे दावा

इराकमधील बेपत्ता 39 भारतीय जिवंत की मृत याचा पुरावा नाही: सुषमा स्वराज