छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी थेट आक्रमक भूमिका घेत मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्यास विरोध केला आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा भुजबळ यांनी मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत भुजबळ बोलत आहे.


छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, मराठा आरक्षणाला आम्ही कधीच विरोध केला नाही. मात्र, कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याची मागणी मागणी आहे. ओबीसीमध्ये अनेक छोटे-छोटे जाती आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेतल्यास कोणालाही याचा फायदा होणार नाही. आमची जी भूमिका आहे तीच शरद पवार, अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वच पक्षाची आहे. ओबीसी समाजाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी सर्वांची आहे.


काय म्हणाले भुजबळ?


मी बीड आणि माजलगाव गेलो होतो. मी किंवा माझ्या पक्षाने आरक्षणाला विरोध केला नाही.आम्ही हे म्हणतो आहे की,आमच्या आरक्षणाला धक्का न लावता द्या. ओबीसीमध्ये छोट्या जाती आहेत, त्यात मराठ्यांना काही मिळणार नाही. जी आमची भूमिका तीच शिंदे, शरद पवार, फडणवीस यांची आहे.हे आंदोलन सुरू झालं त्यात प्रचंड नासधूस केली. सुभाष राऊत यांच्या हॉटेलमध्ये सर्वात जास्त नुकसान झालं. आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावरील हल्यानंतर त्यावेळी मी सांगितले होते की, हॉटेलला संरक्षण द्या. सोळंके यांच्या घरातील हल्ल्यावेळी कोयते,पेट्रोल बॉम्ब सोबत होते. ओबीसी असल्याने असे हल्ले केले जात आहे. 


त्या न्यायमूर्तींकडून न्याय कसा मिळेल?


जरांगे यांनी उपोषण केले त्यावेळी जो लाठीचार्ज झाला, त्यात पोलीस जखमी झाले. त्यांची बाजू पुढे आले नाही. 70 पोलीस जखमी झाल्यावर काय करणार. त्यांच्या आमच्या सरकारने बदल्या केल्या. पोलिसांवर कारवाई झाली म्हणून, त्यांनी काय व्हायचे तर होऊ द्या हे त्यांनी ठरवलं असावं. पोलिसांवर हल्ला झाला त्याची कडक चौकशी झाली पाहिजे. त्यांचं उपोषण सोडण्यासाठी एक न्यायमूर्ती जात असतील, तर आम्हला काय न्याय मिळणार? मंत्री जातात ते ठीक पण न्यायमूर्ती त्यांना सर म्हणतात, असे भुजबळ म्हणाले.


कुणब्यांना आरक्षण द्या, सरकसकट मराठ्यांना नको


तेलंगणा निवडणूक आहे म्हणून पुरावे मिळत नाही म्हणता, मग 2 दिवसात कसे मिळाले. 13 हजार पुरावे मिळाले म्हणता?, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं चुकीचं आहे. आरक्षण संपवण्याचा घाट सुरु आहे. मंत्रालयापासून खालीपर्यंत सगळीकडे हे सुरु आहे. आवाज उठवणं गरजेचं आहे. कुणबींना आरक्षण मिळावं, पण सरसकट मराठ्यांना नको. तुम्ही मतांसाठी हे करत असाल तर ओबीसींची मतं तुम्हाला नको का?, मराठे म्हणतात भुजबळांना मतदान देऊ नका, मग ओबीसींनीही तसा विचार केला तर?, ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट घातला जातोय. यात अनेकांचा समावेश. मतांसाठी सर्व सुरू असेल तर तुम्हाला ओबीसींची मतं नको का? असे भुजबळ म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Chhagan Bhujbal : सोळंके, क्षीरसागरांच्या घरांवरील हल्ला नियोजित कट, ओबीसी नेते टार्गेट; भुजबळांचे खळबळजनक दावे