Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे (heavy rain) झालेल्या नुकसानीत विमा कंपनीने (insurance company) 70 टक्के शेतकऱ्यांचे (Farmers) दावे फेटाळले आहेत. संभाजीनगर जिल्ह्यात ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टी झाली होती. या नुकसानीत 680548 शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांना पूर्व सूचना दिल्या होत्या. त्यापैकी विमा कंपन्यांनी 229155 दावे स्वीकारले तर 451393 दावे फेटाळले आहेत. यामुळं शेतकरी आक्रमक झाले आहेत. 


शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही पंतप्रधान पीक विमा योजनेतर्गत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांना मदत मिळू शकली नाही. याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी पीक विमा कंपनीला जाब विचारला आहे. मात्र आज संध्याकाळपर्यंत उत्तर न आल्यास याबाबत कृषी अधिकरी थेट शासनाकडे विमा कंपनीची तक्रार करणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी पी. आर.देशमुख  यांनी दिली आहे. 


मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांमध्ये काय स्थिती?


हिंगोली 


हिंगोली जिल्ह्यात नोव्हेंबर 2023 अतीवृष्टीमुळं झालेले मोठे नुकसान झाले होते. 154378 शेतकऱ्यांनी पूर्वसूचना (दावे केले होते)  दिली होती. त्यापैकी 132418 दावे स्वीकारले (विमा परतावा दिला ) आहेत.  
21960 प्रकरणे प्रलंबित आहेत.  (विमा परतावा देणे बाकी आहे )


परभणी


खरीप हंगाम 2023


ऑगस्टमध्ये पावसाचा खंड होता. नोव्हेंबरमध्ये जास्त पाऊस झाला. या काळात 1 लाख 98 हजार तक्रारी विमा कंपनीकडे आल्या होत्या. यापैकी 1 लाख 2 हजार तक्रापी विमा कंपनीने स्वीकारल्या आहेत. पुन्हा आंदोलन केल्यानंतर 30 हजार तक्रारी स्वीकारल्या आहेत. 66000 अर्ज नाकारले आहेत.  


जालना 


ऑक्टोबर ते नोव्हेंबर 2023 मध्ये जालना जिल्ह्यात अतीवृष्टीमुळं मोठँ नुकसान झालं होतं. यावेळी 610834  शेतकऱ्यांनी अर्ज  केले होते. त्यापैकी 97822 दावे स्वीकारले. 


लातूर 


ऑक्टोबर नोव्हेंबर 2023 लातूर जिल्ह्यात अतीवृष्टीमुळं मोठं नुकसान झालं होतं. 121185  शेतकऱ्यांनी पूर्वसूचना(दावे केले होते)  दिली होती. त्यापैकी 11604 दावे स्वीकारले. तर 109581 दावे फेटाळले आहेत. त्यामुळे पिक विमा कंपन्या प्रत्यक्ष किती शेतकऱ्यांना मदत करतात हे यावरून स्पष्ट होते.


छत्रपती संभाजीनगरात अनेक गावांत शेतकऱ्यांना केवळ 70 ते 73 रूपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. तसे मेसेजही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आले आहेत. शेतीमालाला भाव नाही, नैसर्गिक आपत्ती, आणि त्यातही सरकार आणि विमा कंपन्यांनी ही अशी थट्टा लावली आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. पिकविम्याचे 70 रूपये आलेत. पण त्यासाठी बँकेत बॅलन्स एक हजार रूपये ठेवावे लागत आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


शेतकऱ्यांची सरकार, विमा कंपन्यांकडून थट्टा; गाजावाजा करत 1 रुपयांत पिक विमा, पण खात्यात भरपाई केवळ 70 रुपये