Ravikant Tupkar: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana) नेते रविकांत तुपकर  (Ravikant Tupkar) यांच्यासह इतर सहकाऱ्यांना बुलढाणा न्यायालयानं (Buldhana Court) दिलासा दिला आहे. तुपकरांसह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना नायालायानं अटी-शर्थींसह जामीन मंजूर केला आहे. तुपकरांसह 25 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली होती. हे सर्वजण अकोला न्यायालयीन कोठडीत आहेत. आज संध्याकाळी या सर्वांची सुटका होण्याची शक्यता आहे.


11 फेब्रुवारीला तुपकरांना पोलिसांनी घेतलं होतं ताब्यात


कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन स्वाभिमानी शेतकरी संघटना (Swabhimani Shetkari Sanghatana) आक्रमक झाली आहे. या प्रश्नावरुन शनिवारी (11 फेब्रुवारी) स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी आत्मदहन आंदोलनाचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात संघर्ष झाला होता. त्यानंतर तुपकरांसह  25 सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, आत्मदहन आंदोलनाच्या दणक्यानं 42 कोटी रुपयांची पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळं रविकांत तुपकरांच्या आंदोलनाला यश आलं आहे. 


अन्नत्याग आंदोलनानंतर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात


रविकांत तुपकर यांनी 11 फेब्रुवारीला बुलढाणा जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर जाऊन, पोलिसी वेशात अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर परिस्थिती आणखी चिघळेल म्हणून पोलिसांनी तुपकरांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिस आणि कार्यकर्ते यांच्या संघर्ष झाला होता. त्यांनतर रविकांत तुपकरांना बुलढाण्याहून अकोला कारागृहात हलवण्यात आले होते. रविकांत तुपकर यांच्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. जोपर्यंत लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत अन्नाचा एक कणही घेणार नसल्याची भूमिका रविकांत तुपकरांनी घेतली होती. त्यांनी कोर्टातच अन्नत्याग आंदोलन सुरु केलं होतं. त्यांच्या आंदोलनानंतर पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली होती. 


काय आहेत मागण्या?


सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची राज्य आणि केंद्र सरकारने फसवणूक केली असल्याचा तुपकरांनी म्हटलं होतं. हजार शेतकरी गेल्या तीन महिन्यांपासून रस्त्यावर उतरत आहोत. सरकारने वेळोवेळी आमच्यासोबत चर्चा, बैठका केल्या. सरकारने आम्हाला आश्वासनं दिली, त्यांनी आमची फसवणूक केली आहे. कापसाला, सोयाबीनला दरवाढ मिळत नाही. 70 ते 80 टक्के सोयाबीन आणि कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे. तरीही सरकार चर्चा करायला तयार नसल्याचं तुपकरांनी सांगितले होतं. तसेच, अनेक शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची रक्कम मिळाली नसल्याच तुपकरांनी म्हटलं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांचा आत्मदहन आंदोलनाचा दणका; पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात