Ambadas Danve: महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासह महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर राज्यभरातून टीका होत असून, माफी मागण्याची मागणी होत आहे. दरम्यान राज्यपाल यांनी पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना पत्र लिहून सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. तर  राज्यपाल यांनी लिहलेल्या पत्रावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. आता माफीवर विषय थांबणार नाही, राज्यपालांची हकालपट्टी व्हायलाच हवी, अशी मागणी दानवे यांनी केली आहे. 


राज्यपालांवर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिलं आहे. ज्यात,"महापुरुषांचा अनादर करण्याची कल्पना स्वप्नातही करु शकत नाही. वर्तमानातील कर्तव्यशील व्यक्तींचा आदर्श सांगणं म्हणजे महापुरुषांचा अपमान नव्हे," असं त्यांनी गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान आता यावरून विरोधकांकडून राज्यपाल यांच्यावर टीका होऊ लागली आहे. राज्यातील जनतेची माफी मागण्याऐवजी दिल्लीला स्पष्टीकरण दिले जात असून, हा देखील महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रकार असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. 


दानवे यांचे ट्वीट...


दानवे यांनी ट्वीट करत म्हंटले आहे की, 'राज्यपाल महोदयांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून भूमिका विषद केली म्हणे. आपल्या वाचाळपणाचे स्पष्टीकरण दिल्ली दरबारी देऊन आपले बोलवते धनी कोण, हे त्यांनी पुन्हा सिद्ध केले. जनतेची माफी मागण्याऐवजी दिल्लीला स्पष्टीकरण देणे हा देखील महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रकार आहे. माफीवर हा विषय आता थांबणार नाही. या राज्यपालांची हकालपट्टीच व्हायलाच हवी. दिल्लीला केलेले पत्रलेखन ही उरलेली अब्रु वाचवण्याची धडपड आहे. महाराष्ट्राचे मीठ खाऊन येथील मातीला दूषणे देण्याची वृत्ती ठेचल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. हे केंद्र आणि राज्यपालांनी ध्यानी ठेवावे, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे. 




शाई फेकीच्या घटनेवर प्रतिक्रिया...


चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावर झालेल्या शाई फेकीच्या घटनेवर बोलतांना अंबादास दानवे म्हणाले की, एखांद्या मदतीला भीक म्हणणे चुकीचे आहे. मात्र याचवेळी शाई फेकेन हे देखील चुकीचे आहे. तर हे कशामुळे झाले हे देखील विचार करण्याची गरज आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओ शुटींग केली म्हणून पत्रकारावर कारवाई झाली आहे. त्यामुळे स्तर कोण घसरवत आहे, असे म्हणत दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला. 


Chandrakant Khaire: चंद्रकांत पाटलांवर शाई फेकणाऱ्याचे खैरेंकडून अभिनंदन, म्हणाले...