Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरात (Aurangabad City) समोर आलेल्या एका घटनेने खळबळ उडाली आहे. मोबाइलच्या (Mobile) अतिवापरामुळे वडील रागावल्याने 20 वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या (College Girl Committed Suicide) करण्याचा प्रयत्न केला होता. तर बुधवारी पहाटे उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला आहे. शहरातील गारखेडा परिसरातील न्यू हनुमाननगरमध्ये ही घटना घडली आहे. आरती सुनील सिदलंबे ( वय 20 वर्षे, रा.  न्यू हनुमाननगर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. 


याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गारखेड्यातील न्यू हनुमाननगरमध्ये कुटुंबासह राहणारी आरती पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होती. दरम्यान 18 डिसेंबरला सुनील सिदलंबे हे काम आटोपून घरी परतले. त्यावेळी त्यांना आरतीच्या हातात मोबाइल दिसला. मोबाइलच्या अतिवापरामुळे आई-वडिलांनी आरतीला अनेकदा समजावून सांगितले होते. मात्र आरतीच्या अति मोबाईल वापरण्याची सवय काही कमी झाली नाही. त्यामुळे रविवारी आरतीच्या हातात मोबाइल पाहून वडील तिला पुन्हा रागावले आणि याचाच राग मनात धरत आरतीने टोकाचे पाऊल उचलेले. 


अन् आरतीने विष प्राशन केलं...


आरतीच्या हातातील मोबाईल पाहून वडील तिला रागवले. त्यामुळे याचा राग आल्याने आरती थेट आतील खोलीत निघून गेली.  खोलीत गेलेल्या आरतीने थेट विष प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार आई-वडिलांच्या लक्षात येताच आरतीला एमआयटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने तिला घाटी रुग्णालयात हलवण्यात आले होते. आयसीयूमध्ये दाखल असलेल्या आरतीवर उपचार सुरू असताना बुधवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. 


पालकांची चिंता वाढवणारी बातमी... 


या घटनेने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे. मुलांना लागलेले मोबाइलचे व्यसन ही पालकांसाठी सर्वाधिक चिंतेची बाब बनली असल्याचे चित्र सद्या पाहायला मिळत आहे. मुलांमध्ये हिंसेच्या घटनांमध्ये सध्या सर्वाधिक कारण मोबाइल व्यसन असल्याचे देखील अनेकदा समोर येत आहे.  आठवी ते पदवीचे शिक्षण घेणारे तरुण, तरुणी सर्वाधिक मोबाईलच्या आहारी गेल्याचे समोर येत आहेत. तर पालक स्वत: मोबाइलपासून दूर राहिल्यास याचा पाल्यावरही सकारात्मक परिणाम होतोम असे मत  मानसोपचातरज्ज्ञ यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे. 


Aurangabad: एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार, संतापजनक घटनेनं औरंगाबाद हादरलं