एक्स्प्लोर

औरंगाबादच्या शेतकऱ्यांची महावितरणाने वाढवली चिंता; अनेक भागांत विजेचा लपंडाव, शेतकरी संतप्त

Aurangabad News: विजेचा लपंडाव सुरू असल्याने, पिकांना पुरेसं पाणी देता येत नाहीये.

Aurangabad News: कधी आस्मानी, तर कधी सुलतानी संकटाने शेतकरी सतत संकटात सापडला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील सध्या अशाच एका संकटाचा सामना करावा लागत आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात (Aurangabad District) महावितरणाचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय. सध्या रब्बीचा हंगामाच्या लागवडी झाल्या असून, पिकांना पाण्याची गरज आहे. मात्र अशातच सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने, पिकांना पुरेसं पाणी देता येत नाहीये. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागांत शेतकऱ्यांचा संताप पाहायला मिळतोय. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांनी थेट महावितरण कार्यालयात गाठत अधिकाऱ्यांना धारेवर धरल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

आधीच खरिपाच्या हंगामात अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे किमान रब्बीच्या हंगामात तरी त्याची भरपाई भरून निघेल यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. मात्र असे असलं तरीही शेतकऱ्यांच्या पाठीमागचं संकट काही सुटता सुटत नाही. त्यातच आता गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादच्या ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे पिकांना पुरेसं पाणी मिळत नसून, याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन, विजेचा पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी शेतकरी करतात. 

शेतकरी संतप्त

औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून कृषी पंपाची वीज सुरळीत सुरू नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, अनेकदा मागणी करूनही वीज पुरवठा सुरळीत सुरू होत नसल्याने, शेतकऱ्यांनी वरखेड येथील महावितरणाच्या सबस्टेशनवर धडक देत जाब विचारला. यावेळी शेकडो शेतकरी महावितरण कार्यालयाच्यासमोर ठाण मांडून बसले होते. त्यानंतर वीज पुरवठा सुरळीत सुरू करण्याचे आश्वासन महावितरण अधिकाऱ्यांनी दिले.

महावितरण कार्यालयावर शेतकऱ्यांची धडक!

दरम्यान, वाळूज महानगर परिसरातील जोगेश्वरी कमळापूर भागांत कृषिपंपाचा वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने पाण्याअभावी पिकांचे नुकसान होत आहे. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, या मागणीसाठी बुधवारी संतप्त शेतकऱ्यांनी वाळूजला महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत आंदोलनाचा इशारा दिला आहे. भरपूर पाणी उपलब्ध असूनही केवळ वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने खरीप हंगामातील पिके वाळत चालली असून उत्पादनात घट येण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी महावितरणच्या वाळूज उपकेंद्रात जाऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. अशीच काही परिस्थिती जिल्हाभरात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.

महत्वाच्या इतर बातम्या : 

जी 20 परिषदेचं शिष्टमंडळ देणार औरंगाबादच्या विद्यापीठ लेणी, मकबरा, सोनेरी महालाला भेट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget