एक्स्प्लोर

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये मान्सूनपूर्व वादळाचा तीव्र तडाखा; लाखो रुपयांचे सोलर पंप उद्ध्वस्त, शेतकरी संकटात

Ahilyanagar Storm Damage : अनेक शेतकऱ्यांचे सोलर पॅनेल्स पूर्णपणे फुटले असून ते आता वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत. लोखंडी अँगल आणि खांबांसह संपूर्ण सोलर यंत्रणा अनेक ठिकाणी मुळासकट उखडून पडली आहे.

अहिल्यानगर : जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने आणि तीव्र वादळी वाऱ्याने प्रचंड थैमान घातले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बसला असून, शेतातील सौरऊर्जेवर चालणाऱ्या सोलर पंपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळाच्या तीव्रतेमुळे कोट्यवधी रुपयांचे सोलर पॅनेल्स तुटून आणि उन्मळून पडल्याने बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे. 

1 जून रोजी सायंकाळच्या सुमारास अचानक हवामानात बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळाचा जोर इतका तीव्र होता की, शेवगाव तालुक्यातील आव्हाने खुर्द, आव्हाने बुद्रुक, शहापूर, आणि बर्हाणपूर परिसराला याचा सर्वाधिक फटका बसला. या परिसरातील शेतांमध्ये बसवण्यात आलेले सोलर पॅनेल्स वाऱ्याच्या प्रचंड वेगाने थेट हवेत उडून गेले, तर अनेक ठिकाणी ते जमिनीवर कोसळून फुटले आहेत.

लाखो रुपयांचे नुकसान; शेतकरी भयंकर चिंतेत

पारंपरिक विजेला पर्याय म्हणून आणि दिवसा सिंचन करता यावे यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून तसेच स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून शेतकऱ्यांनी शेतात सोलर पंप बसवले होते. मात्र, या एकाच वादळाने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडून टाकले आहे.

अनेक शेतकऱ्यांचे सोलर पॅनेल्स पूर्णपणे फुटले असून ते आता वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत. लोखंडी अँगल आणि खांबांसह संपूर्ण सोलर यंत्रणा अनेक ठिकाणी मुळासकट उखडून पडली आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर आणि पेरणीच्या पूर्वतयारीच्या वेळीच सोलर पंप निकामी झाल्यामुळे आता पिकांना पाणी कसे द्यायचे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.

पंचनामे करून तातडीने भरपाई देण्याची मागणी

या अस्मानी संकटामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेवगावमधील शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. महावितरण आणि प्रशासकीय यंत्रणेकडून आता तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

महसूल विभाग आणि कृषी विभागाने तातडीने या वादळग्रस्त भागात संयुक्त पाहणी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. झालेल्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ शासकीय मदत किंवा विमा नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी आर्त हाक शहापूर, आव्हाने आणि बह्रानपूर परिसरातील शेतकऱ्यांकडून प्रशासनाला दिली जात आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये मान्सूनपूर्व वादळाचा तीव्र तडाखा; लाखो रुपयांचे सोलर पंप उद्ध्वस्त, शेतकरी संकटात
अहिल्यानगरमध्ये मान्सूनपूर्व वादळाचा तीव्र तडाखा; लाखो रुपयांचे सोलर पंप उद्ध्वस्त, शेतकरी संकटात
  अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार
  अहिल्यानगर विधानपरिषदेच्या जागेचा तिढा अखेर सुटला, भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध आमदार
धक्कादायक! राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात आढळला कंत्राटी कामगाराचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु
धक्कादायक! राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात आढळला कंत्राटी कामगाराचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरु
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
शेतकरी कर्जमाफीत जाचक अटी, सरकारी नोकदारांना 25 हजारांपर्यंत पगार मर्यादा; शेतकरी संघटना अन् विरोधकांचा संताप
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Shirsat Abdul Sattar EXCLUSIVE : शिदेंची जादू,आरोप-प्रत्यारोप करणारे एकाच गाडीत
Prashant Jagtap On NCP : राष्ट्रवादीने काँग्रेसने विश्वासघात केला, प्रशांत जगताप यांची टीका
Navneet Rana Meet Devendra Fadnavis: राज्यसभेतील सुनेत्रा पवारांच्या जागेवर नवनीत राणा?; भेटीगाठीमुळे चर्चांना उधाण!
Vikram Kakde Vidhan Parishad : विक्रम काकडेंची मालमत्ता 153 कोटींची | Special Report
Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गीतेंची माघार नाहीच, रेश्मा काळे देखील मैदानात | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
चंद्रकांतदादा 'राष्ट्रीय' नेते असून काहीच केलं नाही, सुमित कदमांचा गोकुळ, जिल्ह्याशी संबंध नाही, मुश्रीफांना बोलवलं, पण आम्हाला नाही; शिवाजी पाटलांचा थेट हल्लाबोल, म्हणाले, 'तर मग सतेज पाटील...'
Amol Kolhe: अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
अवघ्या 5 महिन्यांतच 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिकेचा शेवट; पण अमोल कोल्हेंची 'ही' गाजलेली मालिका पुन्हा येणार
NEET Paper Leak : नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
नीट पेपर फोडणारी मनीषा वाघमारे व्हर्टिगो आजाराने ग्रस्त, तिला जामीन द्या; वकिलांचा युक्तिवाद, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला
Beed Crime News: लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर; कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचं वागणं संशयास्पद, डायरी वाचली अन्...,हादरवणारी माहिती समोर
लग्नानंतर अवघ्या 12 दिवसांत तलाठ्याने गळ्याला लावला दोर; कुलदैवताच्या दर्शनाला गेले असताना पत्नीचं वागणं संशयास्पद, डायरी वाचली अन्...,हादरवणारी माहिती समोर
Vidhan Parishad Election 2026: मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,
मोठी बातमी: अखेर काँग्रेसने कारवाईचा बडगा उगारलाच, पक्षादेश नसताना परस्पर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांवर निलंबनाची कारवाई,
Maharashtra Rain Updates: मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
मान्सून काल केरळमध्ये धडकला, आज गोव्यात पोहोचला; महाराष्ट्रात कधी?; हवामान विभागाने तारीख सांगितली, पावसाचे A टू Z अपडेट्स
Uday Samant: 'मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील'; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!
'मी प्रचंड आशावादी, गोकुळ गीते माघार घेतील'; उदय सामंतांना ठाम विश्वास, बाळ मानेंच्या टीकेवरही दिले चोख प्रत्युत्तर!
Uttamrao Jankar : मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला उत्तमराव जानकरांचा आरोप, धैर्यशील मोहिते पाटलांचं एका वाक्यात प्रत्युत्तर 
मोहिते पाटलांनी केसानं गळा कापला उत्तमराव जानकरांचा आरोप, धैर्यशील मोहिते पाटलांचं एका वाक्यात प्रत्युत्तर 
Embed widget