Women Health: मासिक पाळीदरम्यान अनेक स्त्रियांना खूप  रक्तस्त्राव जातो. त्यामुळे गळून गेल्यासारखं वाटणे, खूप अस्वस्थ होणं, थकवा येणं अशा कितीतरी बदलांना सामोरं जावं लागतं. मासिक पाळीच्या पाच दिवसात खूप रक्तप्रवाह गेल्याने अनेकींना एचबी कमी होणे, धाप लागणे, बीपी लोचाही सामना करावा लागतो. मासिक पाळीदरम्यान नेहमीपेक्षा जास्त रक्तस्राव होणं हे दीर्घ परिणाम करणारं ठरू शकतं. गरजेपेक्षा अधिक रक्तस्राव गर्भाशयाच्या कर्करोगाचे कारण असू शकते. कधीकधी पाळी जातानाही असा त्रास होऊ शकतो असे तज्ञ सांगतात.


नेहमीपेक्षा अधिक रक्तस्राव हे एडोमेट्रियल किंवा गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाचे कारण असू शकते. तज्ञ सांगतात, ओटीपोटात दुखणे, योनीतून असामान्य रक्तस्राव, संभोग करताना तीव्र वेदना, वजन कमी होणे, किंवा किडणीचे नुकसान होणे ही लक्षणे दिसत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.


मासिक पाळीत जास्त रक्तस्राव होण्याची कारणे काय़?


हार्मोनल असंतूलन- हार्मोन्समध्ये असंतूलन हे याचे प्राथमिक कारण असू शकते. इस्त्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन गर्भाशयाच्या अस्तराच्या उभारणीचं नियमन करतात. हे दोन हार्मोन असंतूलित झाल्याने अधिक रक्तस्राव होऊ शकतो.


गर्भाशयाच्या फायब्रॉइइस- कर्करोग नसलेल्या गर्भाशयाच्या वाढीमुळे मासिक पाळीत दीर्घकाळापर्यंत मासिक रक्तस्राव वाढू शकतो.


पॉलीप्स- गर्भाशयाच्या अस्तरावर लहान सौम्य वाढ झाल्यानेही रक्तस्राव वाढण्याची शक्यता संभवते.


रजोनिवृत्तीच्या स्त्रियामंध्ये प्रमाण अधिक


मोनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती होत असलेल्या स्त्रियांमध्ये मासिक पाळीत मोठे असंतूलन दिसून येते. मासिक पाळी कधी लवकर येणे, कधी येतच नाही किंवा जर आली तर एखाद्या महिन्यात खूप रक्तस्राव होणे अशी लक्षणे दिसून येतात. यातील पाळीच्या रक्तस्रावाची अनेक कारणे असली तरी कर्करोगाच्या संभाव्य धोक्याकडे दूर्लक्ष न करता, डॉक्टरांचा सल्ला घेतल्याने योग्य  निदान होऊ शकते. जर तुम्हाला सतत खूप जास्त कालावधी होत असेल किंवा तुमची मासिक पाळी नुकतीच नेहमीपेक्षा जास्त जड झाली असेल, तर डॉक्टरांच्या मताशिवाय निष्कर्षापर्यंत जाऊ नये.


तुमच्या आरोग्यापेक्षा गर्भाशय असणे महत्त्वाचे नाही, डॉक्टर म्हणतात...


हेल्थ शॉर्ट वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीनुसार, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीती कौटिश म्हणतात, “हिस्टेरेक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढून टाकणे आणि स्त्रीरोगशास्त्रातील सर्वात सामान्यपणे केल्या जाणाऱ्या प्रमुख शस्त्रक्रियांपैकी एक आहे. "आरोग्याच्या कारणास्तव ज्यावेळी इतर उपचार पर्याय अशक्य ठरतात तेव्हा अशा परिस्थितीत हिस्टेरेक्टॉमी सहसाकेली जाते. डॉक्टर म्हणतात, गर्भाशय हा स्त्रीच्या शरीराचा एक महत्त्वाचा अंतर्गत अवयव आहे परंतु तो तिचे संपूर्ण आरोग्य नाही.


हेही वाचा:


World Lung Cancer Day : काय सांगता..! आता धूम्रपान न करणाऱ्यांनाही Lung Cancer चा धोका? कसा होतो हा कर्करोग? एका अभ्यासातून खुलासा


Women Health : महिलांना गर्भाशय काढून टाकण्याचा सल्ला केव्हा दिला जातो? या परिस्थितीचा सामना कसा कराल? जाणून घ्या...