Health Tips : जसजसा उन्हाळा जवळ आला की सगळ्यांना चाहूल लागते ती आंब्यांची. फळांचा राजा असणाऱ्या आंब्याची सगळेजण वर्षभर आतुरतेने वाट पाहतात. आंबा हा प्रत्येकालाच आवडतो. म्हणून तर तो फळांचा राजा आहे. आंबा खाल्ल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात, त्यामुळे उन्हाळ्यात प्रत्येकाने आंबा खाल्लाच पाहिजे. चला जाणून घेऊ आंब्याचे फायदे. 


वजन कमी करते - लठ्ठपणा कमी करण्यासाठी आंबा हा देखील एक चांगला उपाय आहे. आंब्यामध्ये असलेले फायबर्स शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहेत. आंबा खाल्ल्यानंतर भूक कमी होते. ज्यामुळे जास्त खाण्याचा धोका कमी होतो.


स्मरणशक्ती वाढवते - ज्यांना स्मृतीभ्रंश आहे त्यांनी आंब्याचे सेवन करावे, त्यात आढळणारे ग्लूटामाइन ऍसिड नावाचे तत्व स्मरणशक्ती वाढविण्यास उत्प्रेरक म्हणून काम करते. यासोबतच रक्तपेशीही सक्रिय होतात, त्यामुळे गर्भवती महिलांना आंबा खाण्याचा सल्ला दिला जातो.


रोगप्रतिकारशक्ती वाढवते - जर तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी असेल तर आंब्याचे सेवन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्तीही वाढते.


त्वचा चांगली राहते - आंब्याच्या पल्पचा पॅक चेहऱ्यावर लावल्याने किंवा चेहऱ्यावर चोळल्याने चेहरा सुधारतो आणि व्हिटॅमिन सीमुळे संसर्गापासूनही बचाव होतो.


पचन व्यवस्थित होते - आंब्यामध्ये अनेक एन्झाईम असतात जे प्रथिने तोडण्याचे काम करतात. त्यामुळे अन्न लवकर पचते. यासोबतच यामध्ये असलेले सायट्रिक अॅसिड, टार्टरिक अॅसिड शरीरातील क्षारीय घटकांना संतुलित ठेवते.


कॅन्सरपासून बचाव करते - आंब्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स कोलन कॅन्सर, ल्युकेमिया आणि प्रोस्टेट कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी फायदेशीर आहेत.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha