एक्स्प्लोर

स्थूलपणा घटवण्याचा नवा पर्याय, बेरिअॅट्रिक एण्डोस्कोपी केंद्र सुरु

एण्डोस्कोपी स्लीव गॅस्ट्रोप्लास्टी अर्थात ईएसजी ही सुरक्षित, वेगवान परिणाम देणारी प्रक्रिया आहे. कोणत्याही प्रकारचा छेद न देता वजन कमी करण्याची खात्री आहे.

मुंबई : भारतातील शहरी तरुणांमध्ये स्थूलपणाची समस्या वेगाने वाढत आहे. कोणत्याही शस्त्रक्रियेविना स्थूलपणाशी लढा देण्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध गॅस्ट्रोएंटेरोलॉजिस्ट डॉ. अमित मायदेव आणि जगविख्यात बेरिअॅट्रिक सर्जन डॉ. मोहित भंडारी यांनी एकत्र येत 'एनलायटन' हे बेरिअॅट्रिक एण्डोस्कोपी केंद्र सुरु केलं आहे. स्थूलपणा आणि व्हिसेरल फॅटचा (पोटाच्या पोकळीत जमा होणारी शरीरातील चरबी) त्रास असणाऱ्या तरुणांना या केंद्राची मदत होणार आहे. या डॉक्टर जोडीने आजवर 157 एण्डोस्कोपी स्लीव गॅस्ट्रोप्लास्टी (ईएसजी) प्रक्रिया केल्या आहेत आणि हा आकडा सातत्याने वाढत आहे. वीस ते चाळीस वर्ष वयोगटातील स्थूल व्यक्ती, विशेषत: ज्यांची बैठी जीवनशैली आहे, ते ईएसजीचा पर्याय स्वीकारतात. डॉ. मोहित भंडारी हे इंदूरमधील मोहक बेरिअॅट्रिक्स अॅण्ड रोबोटिक्सचे संस्थापक संचालक आणि मुख्य सर्जन आहेत. डॉ. अमित मायदेव हे मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलच्या बालडोटा इन्स्टिट्यूट ऑफ डायजेस्टिव सायन्सेसचे अध्यक्ष आहेत. आशियात सर्वाधिक बेरिअॅट्रिक सर्जरी करणाऱ्या डॉ. मोहित भंडारी यांनी 2017 साली भारतात ही प्रक्रिया पहिल्यांदा आणली. आजवर 52 महिला आणि 41 पुरुषांवर त्यांनी ईएसजी प्रक्रिया केली आहे. लवकरच इंदूर, मुंबई, हैदराबाद, दिल्ली आणि इतर प्रथम श्रेणी शहरांमध्ये एनलायटनची केंद्रे सुरु होणार आहेत. ईएसजीची वैशिष्ट्ये काय? ईएसजी ही सुरक्षित, वेगवान परिणाम देणारी प्रक्रिया आहे. कमीत कमी काळ हॉस्पिटलमध्ये रहावे लागतं. याशिवाय कोणत्याही प्रकारचा छेद न देता वजन कमी करण्याची खात्री आहे. 15 ते 20 किलो वजन कमी करायचं असून शस्त्रक्रियेची भीती वाटत असणाऱ्यांना ही प्रक्रिया उपयुक्त ठरते कमी बीएमआय असूनही मधुमेह (लो बीएमआय डायबेटिस) आहे, त्यांच्यासाठी परिणामकारक बेरिअॅट्रिक प्रक्रियेनंतरही ज्यांना अपेक्षित परिणाम मिळाले नाहीत किंवा ज्यांनी काही प्रमाणात वजन कमी केले आहे, अशांना आता एंडोस्कोपिक तंत्रांमुळे या एंडोस्कोपिक रिव्हिजन प्रक्रियेतून वजन कमी करता येईल एण्डोस्कोप  या कॅमेरा असलेल्या लवचिक नळीने आणि त्याला जोडलेल्या एण्डोस्कोपिक टाके घालण्याच्या उपकरणाने ही प्रक्रिया करण्यात येते. या सूक्ष्म कॅमेऱ्यामुळे डॉक्टर ही प्रक्रिया छेद न देता करु शकतात. पोटात घातलेले टाके पोटाची रचना बदलतात आणि शरीरात शोषल्या जाणाऱ्या कॅलरींवर मर्यादा आणतात. यानंतर सुरुवातील द्रव आहार सुरु करण्यात येतो. त्यानंतर सेमी सॉलिड आहार आणि नंतर सामान्य सकस आहार करण्यास परवानगी देण्यात येते. काही आठवड्यांमध्ये रुग्ण सामान्यपणे आयुष्य जगू लागतो.

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
Health News: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget