The Kerala Story : निर्माता विपुल अमृतलाल शाह यांचा 'द केरळ स्टोरी' हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. या चित्रपटात 32,000 पीडित मुलींची वेदनादायक कहाणी मांडण्यात आली आहे, ज्यांना प्रथम लव्ह जिहादद्वारे इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडले गेले आणि नंतर ISIS मध्येही सामील होण्यास भाग पाडले गेले. या चित्रपटालाही एक वर्ग विरोध करतोय. काही लोक म्हणतात की हा चित्रपट फक्त एक अजेंडा आहे. त्याच्या ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे, केरळमध्ये असे कधीच घडले नाही. यावर आता विपुल शहा उघडपणे व्यक्त झाले आहेत.


केरळ स्टोरी खरंच एक अजेंडा आहे?


एबीपी लाईव्हच्या मुलाखतीदरम्यान, विपुल शाह यांना विचारण्यात आलेल्या काही प्रश्नाची उत्तर धक्कादायक माहिती देऊन जातात. हा चित्रपट अजेंडा अंतर्गत बनवला गेला आहे अशा मताचा एक वर्ग आहे. या वादावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? याला उत्तर देताना चित्रपट निर्मात्याने सांगितले की, 'हा चित्रपट तीन मुलींच्या सत्यकथेवर आधारित आहे. जर ही तीन मुलींची कथा असेल तर तो फेक अजेंडा कसा असू शकतो. याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही. असं चित्रपटाच्या निर्मात्याने सांगितलं.


शेकडो मुली याच्या बळी ठरल्या आहेत


विपुल शाह पुढे म्हणाले, 'मी याला वाद मानत नाही. ही गोष्ट कशी दाबायची हा त्यांचा अजेंडा आहे असं मला वाटतं. एवढ्या मोठ्या षडयंत्राकडे आणि वादाकडे दर्शकांनी लक्षच देऊ नये असं मला वाटतं. आम्ही या चित्रपटासाठी संशोधन करत असताना आम्हाला शेकडो मुली भेटल्या ज्या हेराफेरीच्या धर्मांतराला बळी पडल्या आहेत, मग हा बनावट चित्रपट कसा? प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टिकोन असतो पण आम्ही सत्याच्या पाठीशी उभे आहोत.


...यातूनच चित्रपट बनवण्याची कल्पना सूचली


विपुल शहा यांना हा चित्रपट बनवण्याची कल्पना कुठून आली असं विचारलं असता त्यांनी उत्तर सांगितले, 'माझ्याकडे एक दिग्दर्शक आहे, त्याने तीन वर्षांपूर्वी माझ्यासाठी स्क्रिप्ट आणली होती. मग पटकथा पूर्ण झाली नाही, फक्त कथा. यावर खूप संशोधन करून त्यावर डॉक्युमेंटरी फिल्म बनवल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही संशोधन सुरू केलं. वर्षभर संशोधन करत राहिलो जेणेकरून आमच्या लिखाणात खोटेपणा नसेल.  मुद्दा आपल्या देशाच्या मुलींचा आहे, त्यामुळे आम्हाला असे काही करायचे नव्हते की लोक म्हणतील की असे यापूर्वी कधीच घडले नाही.


चित्रपटातील प्रत्येक दृश्य सत्य आहे


निर्माता पुढे म्हणाला, 'या चित्रपटातील प्रत्येक सीन, प्रत्येक ओळ खरी आहे. आमची स्क्रिप्ट तयार झाल्यावर आम्ही हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट बनवण्यासाठी तीन वर्षे लागली. विपुल शाहचा हा चित्रपट 5 मे 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती आहे. या सिनेमात अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बालानी आणि सिद्धी इदनानी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


महत्वाच्या बातम्या :