Sukh Mhanje Nakki Kay Asta : स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे. या मालिकेत लवकरच एका खास पाहुण्याची एन्ट्री होणार आहे. जयदीपने गौरीला कड्यावरून ढकलून दिल्यानंतर तिने या जगाचा निरोप घेतला असं वाटत असतानाच आता गौरी सारखी हुबेहूब दिसणारी व्यक्ती शिर्केपाटील कुटुंबात दाखल झालीय. ती गौरीसारखी दिसत असली तरी तिचा अंदाज मात्र निराळा आहे. गौरी साधीभोळी असली तरी ही पाहुणी मात्र अरे ला कारे करणारी आहे.


आता ही गौरी आहे की दुसरी कुणी हे मालिकेच्या पुढील भागांमधून कळेलच मात्र गौरीच्या जीवावर उठलेल्या प्रत्येकाला ती पळता भुई थोडं करणार आहे. त्यामुळे आता ही व्यक्ती मालिकेत कोणता नवा ट्विस्ट आणणार आहे? असा प्रश्न प्रेक्षकांचा पडला आहे. 


'सुख म्हणजे नक्की काय असतं'  या मालिकेत गिरिजा प्रभू, मंदार जाधव, मीनाक्षी राठोड, माधवी निमकर आणि वर्षा उसगावकर हे कालकार प्रमुख भूमिका साकरतात. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहेत. 


निर्माता दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे व्हिजन्सने या मालिकेची निर्मिती केली आहे. सध्या या मालिकेच्या कथानकामुळे मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.


महत्वाच्या बातम्या 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha