Nikki Tamboli : आधी वर्षा उसगांवकर (Varsha Usgaonkar), नंतर अंकिता (Ankita Walavalkar) आणि आर्या (Arya Jadhav) निक्की काही केल्या घरात राडा घालायचं थांबवत नाहीये. ती सतत कोणातरी विषय काढून घरातल्यांसोबत वाद घालत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे घरात निक्की तांबोळी (Nikki Tamboli) हे नाव सध्या बिग बॉसच्या घरात चांगलच गाजतंय. पण असं असलं तरी निक्कीच्या या वागण्यावर नेटकऱ्यांनी चांगलीच नाराजी व्यक्त केली आहे. 


निक्कीने वर्षा उसगांवकरांसोबत घातलेल्या राड्यावरही सोशल मीडियावर तीव्र नाराजीचे सूर उमटत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता रितेश निक्कीला झापणार का हे पाहण्याची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे. त्याचप्रमाणे आता निक्की कोणासोबत नवा राडा घालणार हे देखील पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. 


निक्कीच्या वागण्यावर नेटकरी नाराज


निक्कीने सुरुवातीला वर्षा उसगांवकर यांच्यासोबत राडा घातला. त्यानंतर ती अंकिता आणि आर्यालाही नडली. त्यावर एका युजर कमेंट करत म्हटलं की, निक्की ला हाकलून द्या, ज्याला त्याला बोलत आहे, स्वतःला काय समजते. दुसऱ्या एका युजरने कमेंट करत म्हटलं की, निक्की ही दुसरी राखी सावंत आहे. अजून एका युजरने कमेंट करत म्हटलं की, निक्कीला बिग बॉसमध्ये का घेतलंय, हेच कळत नाहीये.






निक्की आणि वर्षा उसगांवकरांमध्ये राडा


बिग बॉस जेव्हा सांगतात की, आता बेडचा वापर करायला परवानगी नाही. तेव्हा वर्षा उसगांवकर या बिग बॉसला म्हणतात की, चुकून झालं. त्यावर निक्की भडकते आणि ती म्हणते आता आम्हाला भोगावं लागतंय ना. तुमच्यामुळे आम्हाला जमीनीवर झोपावं लागतंय. त्यावर वर्षा उसगांवकर तिला म्हणतात की, माझ्या एकटीमुळे झोपावं नाही लागत आहे. जेव्हा तुम्ही झोपला होता, तेव्हा तुमची अक्कल कुठे गेली होती? निक्कीला वर्षा उसगांवकर म्हणतात की, ओरडू नकोस, त्यावर निक्कीही म्हणते की, तुम्ही शांत बसा.  






बिग बॉसच्या घरात निक्की-अंकिताचा राडा


कोकण हार्टेड गर्ल अंकितावर निक्कीने आधीच नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता नॉमिनेशन टास्कमध्ये आता अंकिता आणि निक्कीमध्ये कडाक्याची भांडण झाले आहे.  टास्क दरम्यान निक्की अंकिताला धक्का देत असते. त्यावर अंकिता आक्षेप घेते. त्यानंतर निक्की अंकिताला धक्का देते. अंकिता चिडून मला धक्का देऊ नकोस असे सांगते आणि तिला ढकलते. त्यावर निक्की मला हात लावायचा नाही असे ओरडून अंकिताला सांगते. 






आर्या आणि निक्कीमध्ये नेमकं काय झालं?


आर्या आणि निक्की वाद होतात, तेव्हा आर्या निक्कीला म्हणते की, तुला घाबरायला पाहिजे.त्यावर निक्की आर्याला म्हणते की, तू फट्टू आहेस एक नंबरची. त्यामध्येच निक्की आणि अरबाजमध्येही हडतुड झाली. त्यामुळे या वादात घरातल्या इतर सदस्यांनी देखील उडी घेतली. आता या वादाचे काय पडसाद उमटणार याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. 






ही बातमी वाचा : 


Bigg Boss Marathi 5 : निक्कीनं कोकण हार्टेड गर्लला रडवलं; काही बाजूनं, तर काही विरोधात; नेटकऱ्यांच्या कमेंट्सनी हसवलं