Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरात (Bigg Marathi New Season 5) आज पहिलं नॉमिनेशन टास्क पार पडणार आहे. नॉमिनेशन टास्क नेमका कसा असेल? यात कोण सेफ आणि कोण नॉमिनेट होणार याकडे प्रेक्षकांचे  लक्ष लागलं आहे. 'बिग बॉस मराठी'च्या घरात नायिका वर्सेस खलनायिका म्हणजेच योगिता चव्हाण (Yogita Chavan) आणि जान्हवी किल्लेकर (Jahnavi Killekar) यांच्यात नॉमिनेशनवरुन पहिली वादाची ठिणगी पडली आहे. बिग बॉसच्या घरात एकत्र राहण्यासाठी चर्चा करणाऱ्या या गर्ल्स गँगमधील सदस्यांमध्ये वाद झाल्याने आता पुढे काय होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. 


'बिग बॉस मराठी' सुरू होऊन चार दिवस पूर्ण झाले असून चौथ्या दिवशीच घरात पहिलं नॉमिनेशन कार्य पार पडणार आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये आजच्या दिवशी नॉमिनेशन कार्याची सुरुवात होणार आहे. प्रतिस्पर्ध्याला घराबाहेर काढण्यासाठी 'बिग बॉस'ने 'नॉमिनेशन तोफ' हा टास्क आणला आहे. प्रतिस्पर्धी स्पर्धकाला नॉमिनेट करण्यासाठी एक खेळ खेळावा लागणार आहे. पहिल्या टास्कदरम्यान 'बिग बॉस'ने ज्यांच्याकडे स्वत:ची स्टॅटर्जी नाही...दुसऱ्यांच्या आधारे पुढे जाण्याचा प्रयत्न करतात अशा सदस्यांना नॉमिनेट करण्यास सांगितले आहे. यावरूनच योगिता चव्हाण आणि जान्हवी किल्लेदार यांच्यात नॉमिनेशनवरुन वादाची ठिणगी पडली आहे. 


नॉमिनेशनवरुन जान्हवी म्हणते,"योगिताने मुर्खासारखं कारण न देता नॉमिनेट केलं आहे". दरम्यान योगिता म्हणते,"जान्हवी मी तुझ्यासारखं मुर्खासारखा हा शब्द वापरलेला नाही. तू तोंडावर वेगळी आहेस आणि मागे वेगळी वागतेस, असं थेट सुनावते. तर यावर जान्हवी म्हणते,"पण मला योग्य कारण तर दे". त्यावर योगिता म्हणते,"बिग बॉस'ने सांगितल्यानुसारच मी नॉमिनेट केलं असल्याचे कारण तिने दिले. 


निक्की आणि आर्यामध्ये फाईट


'बिग बॉस'च्या घरात निक्की चांगलीच आक्रमक झाली असल्याचे दिसून आले आहे. निक्कीचे घरातील सदस्यांसोबत खटके उडण्यास सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या घरात आता निक्की आणि आर्यामध्ये जोरदार वाद झाला आहे. अरबाजही आर्यासोबत वाद घालतो. या खडाजंगीमुळे घरातील वातावरण चांगलेच तापले आहे. 


इतर संबंधित बातमी :