Marathi Serial TRP Rating : मराठी मालिका (Marathi Serial) विश्वात सध्या नवनवीन प्रयोग होत असतात. प्रेक्षकांना मालिकेत खिळवून ठेवण्यासाठी निर्माते सतत मालिकेत नवीन ट्विस्ट आणत असतात. मालिकांसोबतच मालिकांच्या टीआरपी रेटिंगकडेदेखील प्रेक्षकांचे लक्ष लागलेले असते. टीआरपी रिपोर्टमध्ये अनेकदा चढ-उतार पाहायला मिळत असतो. नुकताच या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. अभिनेत्री जुई गडकरीच्या (Jui Gadkari) 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) या मालिकेने नेहमीप्रमाणे या आठवड्यातही टीआरपीच्या शर्यतीत बाजी मारली आहे. टॉप 10 मालिका कोणत्या आहेत, जाणून घ्या...


1. टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' (Tharla Tar Mag) ही मालिका पहिल्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे.


2. तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून ही मालिका टीआरपीच्या रेसमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहे.


3. 'तुझेच मी गीत गात आहे' (Tuzech Mi Geet Gaat Aahe) ही मालिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 6.5 रेटिंग मिळाले आहे. 


4. 'लक्ष्मीच्या पाऊलांनी' (Lakshmichya Paulanni) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत चौथ्या क्रमाकांवर असून या मालिकेला 6.3 रेटिंग मिळाले आहे.


5. 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत पाचव्या क्रमांकावर असून या मालिकेला 5.9 रेटिंग मिळाले आहे.


6. टीआरपी लिस्टमध्ये 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका सहाव्या स्थानावर आहे. या मालिकेला 5.7 रेटिंग मिळाले आहे.


7. 'कुन्या राजाची गं तू रानी' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सातव्या स्थानावर आहे. टीआरपी रिपोर्टनुसार या मालिकेला 5.5 रेटिंग मिळाले आहे.


8. 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आठव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.9 रेटिंग मिळाले आहे. 


9. टीआरपीच्या शर्यतीत 'आता होऊ दे धिंगाणा 2'  हा कार्यक्रम नवव्या क्रमांकावर आहे. या कार्यक्रमाला 3.8 रेटिंग मिळाले आहे.


9. 'मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत नवव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 4.0 रेटिंग मिळाले आहे. 


10. 'शुभविवाह' ही मालिका टीआरपी रिपोर्टमध्ये दहाव्या क्रमांकावर आहे. या मालिकेला 3.5 रेटिंग मिळाले आहे.


वर्षाच्या शेवटीही 'ठरलं तर मग'ने मारली बाजी


'ठरलं तर मग' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. गेल्या काही दिवसांपासून ही मालिका प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. टीआरपीच्या शर्यतीतदेखील या मालिकेने बाजी मारली आहे. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यातही ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल ठरली आहे. दिवसेंदिवस या मालिकेच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे.