Bigg Boss Marathi 3 : बिग बॉसच्या घरात सर्वांच्या लाडक्या आजीचे आगमन झाले होते. कमी दिवसांत घरातील सदस्य आजीसोबत जोडले गेले होते. सदस्य आजीसोबत वेळ घालवताना दिसून आली. तर सदस्यांनी आजीसमोर भांडणेदेखील केली. आजीने दिलेला खाऊ सगळ्यांनी मिळून खाल्ला. आजीसोबत गप्पा मारल्या. पण आजीने कमी वेळात घरातल्या सदस्यांसोबत चांगला वेळ घालवला. आजच्या भागात आजी बिग बॉसच्या घराचा निरोप घेणार आहे. 


आज आजीचा शेवटचा आवाज घरात घुमणार आहे. आजी म्हणाली,"मला इथे येऊन एक आठवडा झाला सुध्दा. चला... आता निरोप घ्यायची वेळ आली आहे... माझी इच्छा आहे की, तुम्ही तुमच्या आजीला जे काही सांगायचे राहून गेलं असेल ते मला सांगा". आजीच्या या घोषणेनंतर घरातील सर्व सदस्यांना अश्रू अनावर झाले आहेत. सगळेच सदस्य भावूक झालेले दिसून आले. 


मीराने तिच्या भावना, खंत, तक्रार आजीसमोर व्यक्त केल्या आहेत. मीरा म्हणाली,आजी माझी तक्रार आहे तुमच्याकडे खूप लवकर गेलात तुम्ही. जेव्हा पूर्ण जगाशी मी एकटी लढत होते, कोणीही नव्हतं माझ्याबरोबर तेव्हा मला वाटायचं... माझी आई देखील म्हणायची जर आजी असती तर तुझ्याबरोबर असती. मी जिथे राहिली असती तिथे ती राहिली असती. अगदी 16-17 वयाची मी असताना तू गेलीस आणि त्याच्यानंतर सगळ्या जगासोबत मी एकटी लढली आहे. तुझ्याशिवाय... पण इथे बिग बॉसच्या आजीला बघितल्यावर मला एक वेगळं असं कनेक्शन वाटलं होतं... म्हणजे समोर आहे बसं एवढच हवं आहे, बाकी काही नसेल तरी चालेल. फक्त दिसतं राहा कधी कधी.


बिग बॉसच्या घरात आज विकास आणि तृप्ती ताई एका महत्तवाच्या मुद्द्यावर संभाषण करताना दिसणार आहेत. बिग बॉसच्या घरात आता दोन गट झालेले स्पष्टपणे दिसून येत आहेत. उत्कर्ष, मीरा, गायत्री, जय, स्नेहा, दादूस आणि तृप्तीताई एका गटात तर विकास, विशाल, आविष्कार, मीनल, सोनाली आणि आदिश यांचा एक गट आहे. पण या दोन्ही गटांमध्ये स्नेहा, तृप्तीताई आणि दादूसचं बॉन्डिंग कमी झालेले अजिबात दिसून येत नाही. आज तृप्ती देसाई आणि विकास पाटील सदस्यांचे मत किती महत्तवाचे असणार आहे यावर चर्चा करताना दिसून येणार आहे. 


सोनाली आणि विशालचे मजेशीर खटके उडताना दिसून येत आहेत. आज सोनाली विशालला म्हणाली,"जर मी तुझ्यामध्ये टाईम इनव्हेस्ट करते तर मला तुझ्याकडून रिटर्नची अपेक्षा आहे". त्यावर विशाल म्हणतो,"मी नाही करत का टाईम इनव्हेस्ट". सोनाली म्हणाली,"त्या ग्रुपमधील सदस्यांनी कोणाचं दुसर्‍याच नावं घेतलं का? तू का नाही माझं नावं घेतलंस? विशाल म्हणाला,"मला जे वाटलं ते मी केलं". अशापद्धतीने सोनाली आणि विशाल वाद घालताना दिसून येणार आहेत.