Bigg Boss 15 : शनिवारपासून सुरू झाला आहे. ‘बिग बॉस’ सीझनचे सर्व विजेते, सीझन 15चे (Bigg Boss 15) सदस्य आणि फायनलिस्टच्या कुटुंबाला फिनालेसाठी खास आमंत्रित करण्यात आले आहे. आज (30 जानेवारी) या सीझनचा विजेता जाहीर करण्यात येणार आहे.


निशांत भट्ट (Nishant Bhatt), प्रतीक सहजपाल (Pratik Sehajpal), करण कुंद्रा (Karan Kundrra), शमिता शेट्टी (Shamita Shetty) आणि तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) यांनी संपूर्ण सीझनमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आता विजेतेपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.


शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाशमध्ये चुरस


शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाश यांनी शोच्या सुरुवातीपासूनच छान खेळ खेळला आहे. दोघीही सुरुवातीपासूनच विजेतेपदाच्या प्रबळ दावेदार आहेत. दोघीही आमनेसामने आल्या, तेव्हा त्यांनी आपला मुद्दा प्रेक्षकांसमोर ठामपणे मांडला. तेजस्वी ही एक प्रबळ स्पर्धक आहे, कारण घराबाहेरही तिचे खूप मोठे चाहते आहेत. ती नेहमी टास्कशी प्रामाणिक राहिली आहे आणि प्रेम-मैत्रीशी एकनिष्ठ राहिली आहे. दुसरीकडे, शमिता शेट्टी देखील या ट्रॉफीसाठी पात्र आहे, कारण तिने संपूर्ण सीझनमध्ये स्वतःच्या प्रामाणिकपणाने आणि विचारांच्या स्पष्टतेने प्रेक्षकांना भुरळ घातली.


करण कुंद्रा, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपालही प्रबळ दावेदार


सोशल मीडियाच्या ट्रेंडनुसार, करण कुंद्रा सर्वात मजबूत दावेदार असून, तो शो जिंकण्याचे सर्वात जास्त चान्सेस आहेत. प्रतीक सहजपालने त्याच्या साधेपणा आणि प्रामाणिकपणाच्या बळावर खूप मोठा चाहतावर्गही तयार केला आहे. तर, दुसरीकडे निशांत भट्ट सगळ्यांना टक्कर देत इथपर्यंत पोहोचला आहे. दोस्ती-जंग किंवा टास्क या सर्वच पैलूंवर त्यांनी निष्ठा दाखवली आहे, आपले मत मांडण्यापासून तो कधीही मागे हटला नाही आणि प्रेक्षकांचे सतत मनोरंजन करत राहिला.


कोण जिंकणार ट्रॉफी?


बिग बॉसच्या 15व्या सीझनमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतलेल्या रश्मी देसाईने ‘टॉप 6’मध्ये आपले स्थान निर्माण केले. पण ग्रँड फिनालेआधीच ती घरातून बेघर झाली. आता निशांत भट्ट, प्रतीक सहजपाल, करण कुंद्रा, शमिता शेट्टी आणि तेजस्वी प्रकाश यांच्यात लढत सुरू आहे.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha