Aai Kuthe Kay Karte  आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte)  या मालिकेमध्ये सध्या ईशा आणि अनिश यांच्या लग्नाची बोलणी सुरु आहे.  लग्नाची बोलणी करण्यासाठी अनिशचे कुटुंब देशमुखांच्या घरी आले आहेत. ईशाच्या लग्नाला अनिरुद्धचा विरोध आहे. आई कुठे काय करते या मालिकेच्या प्रोमोमध्ये दिसत आहे की,  अरुंद्धती ही अनिरुद्धला ईशाच्या लग्नाबद्दल समजवून सांगत आहे. ईशाच्या लग्नाला विरोध करुन अनिरुद्धनं केलेल्या चुकीची जाणून अरुंधती करुन देत आहे. 


प्रोमोमध्ये दिसत आहे की, अरुंद्धती म्हणते,  'आपण या वयाचे असताना आपण काय केलं होतं ते आठवा ना, कमी अधिक प्रमाणात आपणही असेच वागलो होतो.' यावर अनिरुद्ध म्हणतो, 'मग तुलना करायची आहे तर सगळ्याचीच करा, ईशाला हेही सांग की मी खूप शिकलो, मी खूप सक्सेसफुल करिअर केलं आहे.'


पुढे अरुंंद्धती अनिरुद्धला म्हणते,  'आपण सुरक्षीत वातावरणात आणि छान कुटुंबात वाढलो. आपण या गोष्टी तिला देऊ शकलो नाही. लहानपणी लाडात वाढलेली अचानक एका वादळाला समोरी गेली, असं काही झालंय ईशातं' यावर अनिरुद्ध प्रतिक्रिया देतो, यापेक्षा वाईट  वातावरणात मुलं वाढतात तरीही खूप शिकतात, यशस्वी होतात.' आता अरुंद्धती ही अनिरुद्धसा समजवण्यात यशस्वी होईल का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. 






काही दिवसांपूर्वी ईशाच्या लग्नाबाबत अनिरुद्धनं म्हणजेच  मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं होतं, 'एका बापाची व्यथा अनिरुद्ध च्या माध्यमातून मांडली जात आहे. अनिरुद्ध खूप चुकीचा वागतो आहे, एका चांगल्या कार्यात विघ्न आणतो आहे असं सगळ्यांनाच वाटणं साहजिक आहे, पण खरंच विचार केला तर अनिरुद्ध च म्हणणं अगदी बरोबर आहे, अनिरुद्ध म्हणतोय जोपर्यंत माझी मुलगी तिच्या पायावर उभी राहत नाही.'


'आई कुठे काय करते' या मालिकेत आपल्या मुलांच्या सुखासाठी धडपडणाऱ्या आईच्या भूमिकेत मधुराणी दिसत आहे.आई कुठे काय करते मालिकेमधील त्यांच्या अनिरुद्ध ही भूमिका मिलिंद गवळी  हे साकारतात.  तर  संजना ही भूमिका अभिनेत्री रूपाली भोसले ही साकारते. आई कुठे काय करते या मालिकेच्या आगामी एपिसोडची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aai Kuthe Kay Karte: केळकर कुटुंब आले देशमुखांच्या भेटीला; अनिरुद्ध करणार का पाहुणचार?