Shraddha Kapoor Eetha: विठाबाईंना मिळाली होती सिनेमात काम करण्याची संधी? राज कपूर यांची ऑफर नाकारली? कारण काय?
Shraddha Kapoor eetha Vithabai narayangaonkar: स्व. विठाबाई नारायणगावकर यांनी राज कपूर यांची सिनेमाची ऑफर नाकारली असल्याची माहिती.

Vithabai Narayangaonkar Film Offer: तमाशा सादर करताना प्रसुती कळा, बॅक स्टेजला जाऊन मुलाला जन्म अन् पुन्हा त्याच जोमात स्टेज परफॉर्म करणं, यातूनच तमाशा सम्रज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर यांचं लोक कलेप्रति प्रेम आणि प्रेक्षकांसाठी आदर दिसून येते. याच थोर व्यक्तिमत्वाच्या जीवनावर आधारीत श्रद्धा कपूरचा 'ईठा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 'ईठा' सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून या चित्रपटाची प्रचंड चर्चा झाली. प्रसुती वेदनेदरम्यानचा सीन पाहून अंगावर अक्षरश: काटा येतो. त्यांनी आपल्या कारकिर्दीत कलेला अधिक महत्त्व दिलं.
विठाबाईंचा जन्म 1 जुलै 1935 रोजी महाराष्ट्रातील पंढपुरात झाला. त्यांना आपल्या कुटुंबातून लोककलेचा वारसा लाभला. त्यांचे आजोबा नारायण खुदे यांनी फिरते तमाशा पथकाची स्थापना केली होती. तर, विठाबाईंचे वडील भाऊ बापू नारायणगावकर यांनी आजोबांची परंपरा पुढे चालवली. रंगीबेरंगी पोशाख, रंगमंच आणि प्रेक्षकांच्या सानिध्यात राहिल्यामुळे विठाबाईंनी लहानपणीपासून लोककलेचे धडे गिरवले.
विठाबाईंनी लहानपणापासून लावणी, गवळण आणि इतर लोककला आत्मसात केले. ते कधीही अभिनय शाळेत गेलेले नाही. प्रसिद्ध मराठी नाटककार मामा वारेकर यांनी स्व. विठाबाईंचा परफॉर्मन्स पाहिला होता. त्यांना विठाबाईंचा स्टेज परफॉर्मन्स प्रचंड आवडला होता. मामा वारेकरांनी त्यांना आपल्या नाट्यमंडळात सामील होण्याची संधी दिली होती, अशी माहिती आहे.
प्रसिद्धीच्या झोतात असताना विठाबाईंना सिनेमात काम करण्याची ऑफर मिळाली होती (Eetha Vithabai Narayangaonkar film offer by raj kapoor)
View this post on Instagram
विठाबाईंची प्रसिद्धी इतकी वाढत गेली, ते अल्पावधीतच प्रकाशझोतात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केवळ नाटक नाही तर, त्यांना सिनेमातही काम करण्याची संधी मिळाली होती. अनेकांचं सिनेमात काम करण्याचं स्वप्न असतं. अनेक जण सिनेमात काम मिळावं यासाठी धडपड करत असतात. माहितीनुसार, फिल्ममेकर राज कपूर यांना विठाबाईंना सिनेमात कास्ट करायचे होते. पण विठाबाईंनी याबाबत आश्चर्यकारक निर्णय घेतला.
नाट्य दिग्दर्शक शंतनु घुले यांच्या 'विठा' या नाटकानुसार, विठाबाईंना असे वाटत होते की, तमाशा सोडल्यास तिच्या पथकात काम करणाऱ्या लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी स्टारडम निवडण्याऐवजी लोककलेला प्राधान्य दिलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















