Lok Sabha Election 2024 :  अवघ्या देशाचं लक्ष सध्या एकाच दिवसाकडे लागून राहिलंय. देशाचा आणि राजकारणाच्या पुढच्या पाच वर्षांचा निकाल हा येत्या 4 जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. संपूर्ण देशभरात या दिवसाची आतुरेतेने वाट पाहतायत. लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) निकालचं थेट प्रक्षेपण करण्यासाठी माध्यमांनी देखील कंबर कसलीये. जनतेपर्यंत निकालाची प्रत्येक अपडेट पोहचवण्यासाठी बरीच तयारी करण्यात येत आहे. त्यातच आता देशाचा निकाल हा सिनेमागृहात दाखवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. 


ठाणे लोकसभा मतदारसंघाची मोजणी करण्यासाठी सिनेमागृहांची चाचपणी सुरु असल्याची माहिती दिली आहे. पण यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती  जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी दिली आहे. राज्यातल्या 48 जागांसाठी लोकसभेची मतदानाची प्रक्रिया पार पडली. यामध्ये अनेक लढती ह्या यंदा अस्मितेच्या झाल्या आहेत. त्यातच राज्यातील राजकारणाची समिकरणं बदलल्यानंतर अवघ्या देशाचं लक्ष राज्याच्या निकालाकडे लागून राहिलंय. 


एक्झिट पोलची प्रतीक्षा


उद्या म्हणजेच 1 जून रोजी देशातील सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर एक्झिट पोलची सर्वांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. एक्झिट पोलच्या माध्यमातून देशाचा कौल नेमका कोणाला आहे, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. पण अखेरच्या सगळ्या गोष्टी ह्या येत्या 4 जून रोजीच स्पष्ट होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


एबीपी माझावर पाहाल निकाल


लोकसभा निवडणुकांच्या निकालाची रणधुमाळी ही 4 जून रोजी दिवसभर एबीपी माझावर पाहता येणार आहे. त्याचप्रमाणे एबीपी माझाच्या वेबसाईटवर आणि युट्युब चॅनलवरही निकालाचे प्रत्येक अपडेट्स वेळोवेळी मिळतील.  


सात टप्प्यात पार पडली मतदानाची प्रक्रिया


देशात एकूण सात टप्प्यात लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. तसेच महाराष्ट्रात एकून पाच टप्प्यात ही प्रक्रिया पार पडली. पहिला टप्पा हा 19 एप्रिल, दुसरा टप्पा हा 26 एप्रिल, तिसरा टप्पा 7 मे, चौथा टप्पा 4 मे , पाचवा टप्पा 20 मे, सहावा टप्पा 2 मे आणि शेवटचा आणि सातवा टप्पा हा 1 जून रोजी, अशी ही संपूर्ण प्रक्रिया होती. यामध्ये आता शेवटच्या टप्प्यातील मतदान उरले असून अवघ्या काही दिवसांमध्ये निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 


ही बातमी वाचा : 


Arjun Kapoor Malaika Arora : अखेर नात्याला दिला पूर्णविराम! 19 वर्षांचा संसार मोडून केलेलं प्रेमही ठरलं अपयशी;अर्जुन-मलायकाच्या ब्रेकअपच्या चर्चांवर शिक्कामोर्तब?