एक्स्प्लोर

FIR Against Vijay Deverakonda For His Controversial Remark: विजय देवरकोंडा अडचणीत? रश्मिकाच्या रुमर्ड बॉयफ्रेंडवर आदिवासी समाजाची तुलना दहशतवाद्यांशी केल्याचा आरोप; नेमकं घडलं काय?

FIR Against Vijay Deverakonda For His Controversial Remark: साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडावर आदिवासी समाजाची तुलना दहशतवाद्यांशी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

FIR Against Vijay Deverakonda For His Controversial Remark: साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा (South Superstar Vijay Deverakonda) मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल (FIR Filed) करण्यात आला आहे. मिडिया रिपोर्ट्सनुसार, विजय देवरकोंडानं (Vijay Deverakonda) माला आदिवासी समुदायाबद्दल टिप्पणी (Comment On The Tribal Community) केली, ज्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याप्रकरणीअभिनेत्याविरुद्ध 17 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. 

हे प्रकरण 26 एप्रिल 2025 मधलं आहे. त्यानंतर अभिनेता सूर्याच्या 'रेट्रो' चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान विजय देवरकोंडा यांनी हैदराबादमधील आदिवासी समुदायाबद्दल टिप्पणी केल्याचा आरोप आहे. यावर बराच गोंधळ उडाला आणि अभिनेत्यावर आदिवासी समुदायाच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला. पोलिसांनीही तात्काळ या प्रकरणाची चौकशी सुरू केलेली.

विजय देवरकोंडाच्या वक्तव्यानंतर खळबळ 

विजय देवरकोंडानं कार्यक्रमात बोलताना पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर प्रतिक्रिया दिली आणि म्हणाला की, "काश्मीरमध्ये जे काही घडतंय, त्यावर उपाय म्हणजे त्यांना (दहशतवाद्यांना) शिक्षित करणं. तसेच, आपण त्यांचं ब्रेनवॉशिंग होणार नाही, याची खात्री केली पाहिजे. ते काय साध्य करतील? काश्मीर भारताचं आहे आणि काश्मिरी आपले आहेत."

"ते असं वागतायत, जसं 500 वर्षांपूर्वी आदिवासी अजिबातच काही विचार न करता लढलेले..." 

अभिनेता पुढे म्हणाला की, "भारताला पाकिस्तानवर हल्ला करण्याचीही गरज नाही, कारण पाकिस्तानी स्वतः त्यांच्या सरकारला कंटाळले आहेत आणि जर हे असंच चालू राहिलं, तर ते त्यांच्यावर हल्ला करतील. जसं 500 वर्षांपूर्वी विचार न करता लढलेल्या आदिवासींसारखे वागत आहेत. आजही लोक कसलाही मागचा पुढचा विचार न करता लढतायत." 

विजय देवरकोंडावर आदिवासींची तुलना दहशतवाद्यांशी केल्याचा आरोप

विजय देवेराकोंडाचं वक्तव्य आदिवासी नेत्यांना आवडलं नाही आणि त्यांनी अभिनेत्यावर आदिवासींची तुलना दहशतवाद्यांशी केल्याचा आरोप केला आहे. आदिवासी समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल एससी/एसटी कायद्यांतर्गत त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. आदिवासी समुदायांच्या संयुक्त कृती समितीचे राज्य अध्यक्ष नेनावथ अशोक कुमार नाईक यांनी विजयविरुद्ध हा गुन्हा दाखल केला आहे.

विजय देवरकोंडानं मागितलेली माफी, स्पष्टीकरणंही दिलेलं 

या प्रकरणात विजय देवेराकोंडानं 3 मे रोजी माफी मागितलेली आणि ट्विटरवर लिहिलेलं की, "माझ्या लक्षात आलंय की 'रेट्रो'च्या ऑडिओ लाँच कार्यक्रमादरम्यान मी केलेल्या वक्तव्यांमुळे काही लोक नाराज झाले आहेत. मी प्रामाणिकपणे स्पष्ट करू इच्छितो की, कोणत्याही समुदायाला, विशेषतः आपल्या अनुसूचित जमातींना, ज्यांचा मी खूप आदर करतो आणि आपल्या देशाचा अविभाज्य भाग मानतो, दुखावण्याचा किंवा लक्ष्य करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता."    

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'मी श्रेयस अय्यरच्या मुलांची आई, माझं त्याच्याशी लग्न झालंय...'; 'गंदी बात' फेम अभिनेत्रीचा दावा, नेमकं काय म्हणाली?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmers : आरक्षणाच्या लढाईपेक्षा मातीची लढाई गरजेची तरच शेतकरी सुखी होईल
Bacchu Kadu Farmer Protest:  बच्चू कडूंच्या आंदोलनाचं सुरुवात ते शेवट, इनासाईड स्टोरी काय?
Bacchu Kadu Farmers Protest :बच्चू कडूंचा नवा लढा, आता पूर्ण महाराष्ट्रात पायी दौरा करणार
Bacchu Kadu On Farmers Loss : शेतकऱ्यांना चालू वर्षांत कर्जमाफी देणं का गरजेचं? बच्चू कडूंनी गणित मांडलं
Bacchu Kadu On Farmers Protest : राजकारण हललं की बच्चू कडू आंदोलन करतात का? बच्चू कडूंचं उत्तर ऐकाच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bihar Election : तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
तेज प्रताप यादव यांना केंद्र सरकारकडून वाय प्लस सुरक्षा, दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी मोठा निर्णय 
Digital Gold : 10 रुपयांत 'डिजीटल गोल्ड' खरेदी करत असाल तर सावधान, गुंतवणूकदारांसाठी ते धोकादायक, सेबीचा कडक इशारा 
10 रुपयांमध्ये डिजीटल गोल्ड घेणं पडेल महागात, सेबीनं धोक्याचा इशारा देत दिला महत्त्वाचा सल्ला 
MPSC : राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
राज्यसेवेच्या 385 जागांसाठी रविवारी पूर्व परीक्षा, सुमारे 1 लाख 75 हजार उमेदवार भवितव्य आजमावणार
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
हे पवार महाराष्ट्राचं विधानभवन आपल्या नावावर करतील; पुणे जमीन प्रकरणावरुन लक्ष्मण हाकेंची जळजळीत टीका
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर बर्निग ट्रकचा थरार, चालकाने दाखवले प्रसंगावधान; मोठा अनर्थ टळला
BJP President : भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार?  राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य, बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
भाजपला नवा अध्यक्ष कधी मिळणार? राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य , बिहार निवडणुकीचा दाखला देत म्हणाले..
Narco Test : नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
नार्को टेस्ट म्हणजे काय? आरोपीला अर्ध-बेशुद्ध करण्यासाठी कोणतं केमिकल वापरतात? आतापर्यंत कुणाकुणाची टेस्ट झाली?
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
सासरचा छळ, सातत्याने पैशांची मागणी, 22 वर्षीय विवाहितेनं संपवलं जीवन; कुटुंबीयाचा सासरच्या दारातच आक्रोश
Embed widget