अलिबाग : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आज विवाह बंधनात अडकला आहे. आपली लहानपणीची मैत्रिण आणि फॅशन डिझायनर नताशा दलाल सोबत वरुनने लग्नगाठ बांधली आहे. अलिबागमधील सासवने परिसरात 'द मेन्शन हाऊस'मध्ये वरुण-नताशाचा विवाह सोहळा पार पडला.


काही खास पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. निर्माता, दिग्दर्शक करण जोहर या विवाह सोहळ्यात उपस्थित होता. वरुणने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनिष मल्होत्राही या लग्न सोहळ्याला हजर होता.


मोबाईल बंदीपासून कोविड चाचणीपर्यंत, वरुण- नताशाच्या लग्नासाठी 'नियम व अटी लागू'


वरुण-नताशाच्या लग्नाच्या गेस्ट लिस्टवर नजर टाकल्यास अनेकांना लग्नाचं निमंत्रण नसल्याचं पाहायला मिळतंय. डेविड धवन आणि वरुण धवनचे बऱ्याच मित्रांना आमंत्रण नसल्यामुळे ते रागावले जाण्याची शक्यता आहे. पहलाज निहलानी आणि गोविंदा हे डेविड धवन यांचे जवळचे मानले जातात. मात्र यांनाही निमंत्रण नव्हतं. कोविड 19 ची स्थिती पाहता पाहुण्यांच्या यादीत त्यांचा समावेश केलेला नाही.


याशिवाय बोनी कपूर आणि त्याची मुले वरुणच्या अगदी जवळ आहेत, त्यांनाही आमंत्रित केलेले नाही. बच्चन कुटुंबियांनी लग्नाचं निमंत्रण नसल्याचं बोललं जात आहे. मात्र येत्या 26 जानेवारीला वरुण-नताशाच्या लग्नाचं रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे. या रिसेप्शनला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.