नवी दिल्ली : कायम वादग्रस्त विधान करणारी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील एका कोर्टाने शेतकऱ्यांचा अपमान केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना रनौत हिच्याविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले आहेत.


कर्नाटकातील तुमकूर कोर्टाने क्यथसांद्रा पोलीस स्टेशनला कंगना रनौत हिच्याविरूद्ध एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिले आहेत. रमेश नाइल एल यांनी कंगना रनौत हिच्याविरोधात तक्रार दाखल केली. कंगनाने शेतकऱ्यांचा अपमान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.


संसदेत शेतीसंदर्भात तीन विधेयके मंजूर झाल्यानंतर अनेक भागातील शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले की, शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे.


दीपिका-प्रभासच्या जोडीला आता बिग बी


हे ट्विट पुन्हा ट्विट करताना कंगना रनौत म्हणाली, “पंतप्रधान मोदीजी, झोपलेल्याला जागं करता येतं, गैरसमज झालेल्याला समजावून सांगितले जाऊ शकते. मात्र, झोपण्याचं सोंग घेणाऱ्याला, समजून न घेण्याचा अभिनय करत असेल त्याला आपण समजावून सांगण्याने काय फरक पजणार? होईल का? हे तेच दहशतवादी आहेत, सीएएमुळे एकाचंही नागरिकत्व गेले नाही. मात्र, यांनी रक्ताचे वाट वाहिले.





कंगनाच्या या ट्विटवर भरपूर टीका झाली. त्यानंतर कंगनाने 21 सप्टेंबर रोजी स्पष्टीकरण दिले. ती म्हणाले, “ज्याप्रमाणे श्रीकृष्णाकडे नारायणी सैना होती, तसाच पप्पूकडे चंपू सेना आहे, जिला फक्त अफवांच्या आधारे लढायचं माहिती आहे. हे मी माझे मूळ ट्विट आहे, जर कोणी मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं असं सिद्ध केलं तर, मी माफी मागून ट्विटर कायमचं सोडेल.


Kangana Ranaut vs BMC | कंगना रनौत- बीएमसी वादावर सुनावणी पूर्ण; मुंबई हायकोर्टाने निकाल राखून ठेवला