Akshay Kumar on Breakup : बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमार (Akshay Kumar) सध्या 'बडे मियां छोटे मियां' (Bade Miyan Chhote Miyan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांचा हा बहुचर्चित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. खिलाडी कुमार सध्या या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अभिनेत्याने ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे. ब्रेकअपमधून बाहेर पडणे तरुणांना कठीण जाते. ब्रेकअपनंतर अनेक मुलामुलींना नैराश्याचा सामना करावा लागतो. एखाद्या नात्यातून सहज बाहेर पडणं सोपं नसतं. अनेक मंडळी त्यातच अडकुन राहतात. दरम्यान ते व्यसनांच्या आहारी जातात. आता 'बडे मियां छोटे मियां' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अक्षयने ब्रेकअपबद्दल भाष्य केलं आहे. ब्रेकअपमधून बाहेर कसं पडावं याचा सल्ला अभिनेत्याने दिला आहे. अक्षय कुमारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


सर्वसामान्यांसह मनोरंजनविश्वातील सेलिब्रिटींचाही ब्रेकअप होत असतो. काहींना ब्रेकअपमधून कसं बाहेर पडावं हे कळत नाही. त्यामुळे ते त्यांचं करिअरदेखील संपवतात. पण अक्षय कुमारने मात्र ब्रेकअपमधून बाहेर पडण्यासाठी अनोख्या मार्गाचा अवलंब केला आहे. नुकतचं अभिनेत्याने याबद्दल भाष्य केलं आहे. 


अक्षय कुमार सध्या 'बडे मियां छोटे मियां' या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. 11 एप्रिल 2024 रोजी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट रिलीज करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून तो टायगर श्रॉफसोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसून येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान खिलाडी कुमारने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भाष्य केलं आहे. ब्रेकअप मधून तो कसा बाहेर पडत असे हे त्याने सांगितलं आहे.


ब्रेकअपनंतर खिलाडी कुमारला राग अनावर


'द रणवीर शो' या पॉडकास्टमध्ये अक्षय कुमारला ब्रेकअपबद्दल प्रश्न विचारण्यात आला. आतापर्यंत दोन-तीनवेळा ब्रेकअप झाल्याचं त्याने सांगितलं. ब्रेकअप झाल्यानंतर अक्षय कुमार व्यायाम करत असे. ब्रेकअपनंतर खिलाडीला राग अनावर होत असे. तसेच तो प्रमाणापेक्षा जास्त जेवण करत असे. त्यामुळे तरुणांनीदेखील ब्रेकअपमधून बाहेर पडताना जास्त विचार करू नये. व्यायाम करावा, योग्य आहार करावा, असा सल्ला खिलाडी कुमारने दिला आहे.


'या' अभिनेत्रींसोबत जोडलं गेलंय अक्षयचं नाव


बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचं नाव 90 च्या दशकातील अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं आहे. यात रवीना टंडन (Raveena Tandon), शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि पूजा बत्रा (Pooja Batra) सारख्या अभिनेत्रींचा समावेश आहे. रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांचा साखरपुडा झाल्याचीही चर्चा होती. पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. पूजा बत्राला तिच्या करिअरच्या सुरुवातीला अक्षयने खूप मदत केली होती. दरम्यान पूजा आणि अक्षयमध्ये जवळीक वाढली. तसेच शिल्पा शेट्टी आणि अक्षय कुमार यांच्या रिलेशनचीदेखील चांगलीच चर्चा रंगली होती. 'धडकन'च्या रिलीजनंतर त्यांचा ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जातं. तसेच अक्षयचं नाव आयशा जुल्का (Ayesha Jhulka), रेखा (Rekha), प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) या आघाडीच्या अभिनेत्रींसोबतही जोडलं गेलं आहे.


संबंधित बातम्या


Bade Miyan Chote Miyan Review : अक्षय-टायगर पुन्हा अयशस्वी