एक्स्प्लोर

Sanjay Raut on Devendra Fadnavis Eknath Shinde: ...तर शिंदेंनी 29 नगरसेवक कोंडून ठेवले नसते, संजय राऊतांची 'देवाभाऊ', 'एकनाथ भाईं'वर बोचरी टीका; म्हणाले, फडणवीस वेताळाप्रमाणे...

Sanjay Raut on Devendra Fadnavis Eknath Shinde: तुमचं बहुमत कितीही मोठं किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असते, असे म्हणत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.

Sanjay Raut on Devendra Fadnavis Eknath Shinde: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीनंतर (BMC Election) महापौर कोणत्या पक्षाचा होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महायुतीचा महापौर व्हावा हे वरच्या देवाच्याच मनात आहे, त्यामुळे शिंदे साहेब आणि आपण एकत्र बसून चर्चा करू आणि मुंबई चांगल्या पद्धतीने चालवू, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले आहे. तर दुसरीकडे यंदाचे वर्ष बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. त्यामुळे शिवसेनेला अडीच वर्ष महापौरपद द्या, अशी भावनिक साद उपमुख्यमंत्री  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घालू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्याकडून मुंबईतील शिवसेनेच्या 29 नगरसेवकांना एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय.

संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना देवाची इच्छा असेल तर आपला महापौर होऊ शकतो, असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, जे आकडे आहेत, ते जवळजवळ समसमान आहेत. चारचा फरक आहे. जगातला सर्वात मोठा पक्ष ज्याने महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष शिवसेना फोडून एक वेगळा गट निर्माण केला. प्रचंड ताकद आणि सत्तेचा वापर करून देखील त्यांना केवळ चारचे बहुमत मिळाले आहे. तुमचं बहुमत कितीही मोठं किंवा छोटं असू द्या, बहुमत हे चंचल असते, असे त्यांनी म्हटले.

Sanjay Raut on Eknath Shinde: ...तर शिंदेंनी 29 नगरसेवक कोंडून ठेवले नसते

उद्धव ठाकरेंना कोणत्या देवाबाबत बोलायचे आहे? मुंबईत महायुतीचा महापौर बसणार आहे ही देवाची इच्छा आहे, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, महायुतीचा महापौर बसला असता तर त्यांच्या सहकारी गटाने 29 नगरसेवक कोंडून ठेवले नसते. जर इतकं सोपं असतं तर 29 नगरसेवक त्यांच्याच राज्यात कोंडून ठेवले नसते. यावर आमच्या देवाभाऊंचं काय म्हणणं आहे? त्यांची सुटका करा, त्यांचे नातेवाईक काही नगरसेवकांचे अपहरण झाल्याची तक्रार देखील देऊ शकतात, अशी टीका त्यांनी यावेळी शिंदे गटावर केली. 

Sanjay Raut on Devendra Fadnavis: फडणवीस वेताळाप्रमाणे हट्टी

देवेंद्र फडणवीस पाच दिवस दावोस दौऱ्यावर गेलेले आहेत. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, ते दावोसला गेले आहेत. ते अनेकदा दावोसला जातात. परंतु, महाराष्ट्रात कधी गुंतवणूक दिसत नाही. त्यांची सगळी गुंतवणूक निवडणुकीत असते. नगरपालिकांपासून लोकसभेपर्यंत असते. त्यामुळे जी गुंतवणूक प्रदेशातून यायला पाहिजे ती आम्हाला कधीच दिसलेली नाही. दावोसला बसून देखील ते महापालिकेचे राजकारण करणार आहेत तर दावोसला जातातच कशाला? असा म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तर,  फडणवीस महाराष्ट्रात नसले तरी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना हे मान्य होईल का की, अमित शाह यांच्या पक्षाचा इथे महापौर व्हावा. मी फडणवीस यांना जितकं ओळखतो ते वेताळाप्रमाणे हट्टी आहेत, असा टीका देखील संजय राऊत यांनी केलीय.

आणखी वाचा 

BMC Election 2026 Swikrut Nagarsevak: मुंबईत 65 जागांवर विजय खेचून आणणाऱ्या उद्धव ठाकरेंसाठी आनंदाची बातमी, बीएमसीतील नगरसेवकांची संख्या वाढणार

महत्त्वाच्या बातम्या

Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
Embed widget