Punjab Election Result 2022: आज देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. अवघ्या काही तासांमध्येच मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या पाच राज्यामध्ये सर्वा जास्त चर्चा झाली ती पंजाबची. पंजाबमध्ये निवडणुकांच्या निमित्ताने बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या होत्या. सध्या पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. तर पंजाबला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सर्वत राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली होती. आम आदमी पार्टीने पंजाबमध्ये जोरदार टक्कर दिली आहे. एक्झिट पोलमध्ये आप पक्षाला बहुमत मिळाल्याने काँग्रेसला पंजाबमध्ये हादरा बसण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये विधानसभेच्या एकूण 117 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. मतदारांनी यावेळी समिश्र प्रतिसाद दर्शवल्याने 65.32 टक्के मतदानाची नोंद पंजबमध्ये झाली होती. दरम्यान, निवडणुकांच्या निमित्ताने पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. यामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी याठिकाणी प्रचार केला होता. दरम्यान काँग्रेस पक्षाचा विचार करता सध्याचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर मोठी जबाबदारी असून या निवडणुकीसाठी तेच पक्षाचा चेहरा आहेत. त्यामुळे काँग्रेसकडून त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चमकोर साहिब आणि भदौर अशा दोन ठिकाणी ते निवडणूक लढवत आहेत. याशिवाय काँग्रेसचा आणखी एक मोठा चेहरा म्हणजे नवज्योत सिंह सिद्धू हे अमृतसर पूर्वमधून उभे आहेत. तर यंदा एक्झिट पोलमध्ये विजयी आप पक्षाचा मोठा चेहरा म्हणजे भगवंत मान हे धुरी मतदार संघातून उभे आहेत.
पंजाबमध्ये या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला?
चरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) - चमकोर साहिबचरणजीत सिंह चन्नी (काँग्रेस) - भदौरनवज्योत सिंह सिद्धू (काँग्रेस) - अमृतसर पूर्वविक्रम मजिठिया (अकाली दल ) - अमृतसर पूर्वभगवंत मान (आप) - धुरीकॅ.अमरिंदर सिंह (पीएलसी) - पतियाळा शहरप्रकाश सिंह बादल (अकाली दल) - लंबीसुखबीर सिंह बादल (अकली दल) - जलालाबादसुखजिंदर रंधावा (काँग्रेस) - डेरा बाबा नानकमालविका सूद (काँग्रेस) - मोगा
पंजाब निवडणुकांमधील गाजलेले मुद्दे
शेतकरी आंदोलनातील पंजाबपंजाब काँग्रेसमधला अंतर्गत वादकॅ.अमरिंदर सिंह यांचा राजीनामाअंमली पदार्थांचं सावटपंतप्रधान मोदी दौरा सुरक्षा प्रश्न
2017 ची परिस्थिती
2017 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवली होती. 117 जागापैकी काँग्रेसने 77 जागावर विजय मिळवला होता. तर अकाली दल 15, भाजप 3 आणि आम आदमी पार्टीला 20 जागांवर विजय मिळाला होता. तर दोन जागांवर अपक्षांनी बाजी मारली होती. त्यामुळे यंदा काँग्रेस पुन्हा सत्तेवर येणार की आम आदमी पार्टी बाजी मारणार हे पाहावे लागणार आहे. कारण खरी टक्कर आप आणि काँग्रेसमध्येच असल्याचे बोलले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या: